शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

क्लस्टरला तीव्र विरोध; मतदाता जागरण अभियान आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 01:37 IST

मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, भेट नाकारल्यास निदर्शने करण्याचा इशारा

ठाणे : ठाण्यातील क्लस्टर योजनेवरून सध्या काँग्रेस आणि भाजपकडून प्रशासनावर आगपाखड केली जात असतांनाच आता ठाणे मतदाता जागरण अभियाननेदेखील यात उडी घेतली आहे. क्लस्टरमध्ये हक्काची घरे मिळावीत, त्याचा अध्यादेश काढावा, क्लस्टरचा पूर्ण आराखडा देऊन विस्थापित होणाऱ्या सर्वांना आधी हमीपत्र द्यावे अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी देण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी भेट नाकारली तर कार्यक्रमाच्या ठिकाणीच निदर्शने करण्याचा इशाराही दिला आहे.

मंगळवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. क्लस्टरमध्ये ज्या घरांचा समावेश होऊन त्यांची जमीन वापरली जाणार आहे, त्या जमिनीवर ४ एफएसआय दिला जाणार आहे. याचा अर्थ बिल्डरला प्रचंड फायदा होणार, हे स्पष्ट आहे. मग ज्यांच्या जमिनीवर हे टॉवर्स उभे राहणार त्यात ज्यांची घरे तोडली जाणार आहेत त्या सर्वांना किमान ३२३ स्केवर फुटाचे घर मोफत आणि मालकीचे मिळावे. त्याबाबतचा अध्यादेश काढावा, हे सर्व प्रकल्प रेरा कायद्याखाली आणण्याची तरतूद जीआरमध्ये असावी. तसेच पहिल्या जीआरची तारीख पात्रतेसाठी ५ जुलै २०१७ ही कट आॅफ डेट करावी.

क्लस्टरमध्ये ज्या घरांचा समावेश केला जाणार आहे त्यातील रहिवाशांना आज राहात असलेल्या घराची मोजणी करून त्यांचे नाव, सर्व्हे नंबर, पत्ता आदी तपशील असलेले मालकी हक्काचे घर मिळेल, असे हमीपत्र महापालिकेने आधी द्यावे. क्लस्टरचा संपूर्ण आराखडा द्यावा, बांधकामाच्या सर्व परवानग्या आणि पर्यायी निवारा मिळाल्याशिवाय इमारत तोडू नये, एक क्लस्टर हा दहा हजार चौरस मीटरचा असणार आहे. हा विकास बिल्डरमार्फत केला जाणार असून महापालिका फक्त परवानग्या देऊन प्लॅन मंजूर करणार आहे. या परवानग्या बाधीत होणाºया नागरिकांना दाखवून त्यानंतरच इमारत तोडण्याची कारवाई सुरू करण्यापूर्वी जेथे पुनवर्सन केले जाणार त्या जागेचा ताबा दिल्याशिवाय इमारती खाली करू नये, हक्काच्या घराचा करार स्थानिक निवासी, बिल्डर व ठाणे महापालिका असा त्रिपक्षीय केल्याशिवाय घर रिकामे करू नये, क्लस्टर ही मुळात शासनाची योजना आहे. महापालिका ही योजना राबवत असल्याने यात राहणाºया नागरिकांचा करार हा त्रिपक्षीय असला पाहिजे.

क्लस्टरमध्ये फक्त निवास करणारेच बाधित होत नाहीत तर छोटे व्यापारी ही विस्थापित होणार आहेत. एकदा क्लस्टरच्या कामास सुरुवात झाली की किमान ३ ते ५ वर्षे त्यांना दुकाने मिळणार नाहीत. त्यांचे उपजिविकेचे साधन संकटात असेल, यासाठी दुकानदारांना ट्रान्झिट बाजार निर्माण करण्यास जागा द्यावी. क्लस्टरअंतर्गत स्वयंपुर्नविकास करू असे एकत्रीत म्हणणाºया नागरिकांना अर्थसहाय्य व अन्य कायदेशीर मदत उपलब्ध करावी या मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार