शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण; सरकारच्या निषेधार्थ संघर्ष समितीकडून जिल्ह्याधिकाऱ्यांना साकडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 6:05 PM

Thane : मोदी सरकारमधील मंत्री मीनाक्षी लेखी यांनी आंदोलक शेतकऱ्यांबद्दल हेटाळणी पूर्वक मवाली अशा शब्दाचा प्रयोग केला आहे, त्यांचा निषेध करीत शेतकऱ्यांच्या मानहानी बाबत त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

ठाणे : दिल्ली सीमेवरील 'शेतकरी आंदोलनाला' २६ जुलैला सात महिने पूर्ण झाल्याची आठवण करून देत केंद्रातील व राज्यातील कॉर्पोरेट धार्जिणे सरकार आहे, शेतकरी विरोधी तीन कृषी विषयक कायदे, राज्यांच्या अधिकारावर गदा आणून, अनाधिकाराने, कायदे मंडळातही मुस्कटदाबी करून भांडवलदारांचे पक्षपाती कायदे मंजूर केल्याचा आरोप करीत त्यांच्या निषेधार्थ येथील जन आंदोलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांद्वारे पंतप्रधान ‌व मुख्यमंत्र्यांना निवेदन देत ‌निषेध व्यक्त केला आहे.

येथील जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. शिष्टमंडळात जन आंदोलनांची संघर्ष समितीचे निमंत्रक  विश्वास उटगी, एम. ए. पाटील, जगदीश खैरालिया आणि सुब्रतो भट्टाचार्य आदींचा या शिष्टमंडळात सहभाग होता. दिल्लीच्या सीमेवर गेली सात महिने संयुक्त किसान संघर्ष समितीमार्फत दीर्घ काळ आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर सरकारने दमन यंत्रणेमार्फत अनेक अन्याय अत्याचार केल्याचा आरोपासह  पाचशेच्यावर शेतकऱ्यांनी आहुती देऊन, हे आंदोलन अथकपणे सुरू ठेवले आहे, असे स्मरण या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे करून दिले आहे.

शेतकऱ्यांचे हे आंदोलन जागतिक कीर्तीचे व ऐतिहासिक असेच आहे. तीन कृषी विषयक कायदे मागे घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा या आंदोलनकर्त्यांनी निर्धार व्यक्त करीत मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी असमर्थ ठरल्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मोदी सरकारमधील मंत्री मीनाक्षी लेखी यांनी आंदोलक शेतकऱ्यांबद्दल हेटाळणी पूर्वक मवाली अशा शब्दाचा प्रयोग केला आहे, त्यांचा निषेध करीत शेतकऱ्यांच्या मानहानी बाबत त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेFarmers Protestशेतकरी आंदोलन