शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

मलंगगड परिसरातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:21 PM

दीपक केसरकर यांचे आश्वासन; नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी

अंबरनाथ : मलंगगड परिसरातील भातशेतीचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे. केसरकर यांनी मंगळवारी मलंगगड परिसरात शेतीची पाहणी करून शेतकºयांच्या अडचणी जाणून घेतल्या.अंबरनाथ तालुक्यात यंदा अवकाळी पावसाने एकूण ९३ गावांतील २७९९.६२ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये सहा हजार ९१७ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यातही मलंगगड आणि नेवाळी परिसरातील बहुतांशी जमीन ही संरक्षण विभागाच्या नावावर आहे. याच जमिनी ताब्यात घेण्यावरून दोन वर्षांपूर्वी नेवाळी आंदोलनही पेटले होते. या जमिनी अनेक वर्षांपासून मूळ मालक असलेले शेतकरी कसत आहेत. यंदा अवकाळी पावसाने या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. जमीन नावावर नसल्याने भरपाई मिळणार कशी? असा प्रश्न शेतकºयांना पडला होता. त्यावर शासकीय जमिनी कसत असलेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याबाबतची चर्चा झाली असून मलंगगड परिसरातील शेतकºयांनाही यामध्ये गृहीत धरले जाईल, असे आश्वासन यावेळी केसरकर यांनी दिले. यावेळी माजी आमदार विनोद घोसाळकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, उपतालुकाप्रमुख रामचंद्र मढवी, चैनू जाधव, संदीप पाटील आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेना संपवण्याची खेळी अयशस्वी!यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला संपवण्याची भाजपची खेळी होती. माझ्या स्वत:च्या मतदारसंघात गोव्याचे भाजपचे मंत्री प्रचार करत होते, तसेच राज्यात अनेक ठिकाणी भाजपने अपक्ष उमेदवार उभे केले होते. त्यामुळे अपक्षांच्या जीवावर सरकार स्थापन करत शिवसेनेला संपवण्याची भाजपची खेळी होती. ती अयशस्वी ठरल्याचे केसरकर म्हणाले. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला. राणे यांना पक्षात घेणेदेखील शिवसेना संपवण्यासाठीची भाजपची खेळी होती. मात्र, राणे जिथे जातात त्यांचे सरकार जाते. शिवसेनेने राणे यांना मुख्यमंत्री केले तेव्हा शिवसेनेची सत्ता गेली, राणे काँग्रेसमध्ये गेले अन् काँग्रेसची सत्ता गेली. आता भाजपचेही तेच झाल्याचे केसरकर म्हणाले.