शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

संकटग्रस्तांच्या मदतीतही ‘दुष्काळ’; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 11:15 PM

ठाणे-पालघरने मागितले ७४ कोटी, दिले अवघे १७.९४ कोटी

- नारायण जाधवठाणे : क्यार व महा या चक्रीवादळांमुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोसळलेल्या अवेळी पावसामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची १०० टक्के शेती नष्ट होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यामुळे ओल्या दुष्काळाचे संकट असून दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने शेतपिकांच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करून आपले अहवाल राज्य शासनाकडे पाठविले. त्यानुसार सध्या राष्ट्रपती राजवटीच्या वरवंट्याखाली चिरडलेल्या या दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी राज्य शासनाने राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन्ही जिल्ह्यांसाठी अवघी १७ कोटी ९३ लाख ७६ हजार इतकी तुटपुंजी मदत वितरित करून मीठ चोळले आहे.यात ठाण्याचा वाटा आठ कोटी २० लाख ६८ हजार तर पालघरचा हिस्सा नऊ कोटी ७३ लाख आठ हजार रुपयांचा आहे. दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच ती देण्यात आली आहे.ठाणे जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरीलभातपिकाच्या नुकसानीपोटी सुमारे ३३ कोटी ८० लाख ९६ हजार रुपयेवरी पिकाच्या ३७ हेक्टरच्या नुकसानीसाठी दोन लाख ९६ हजार रुपयेनागलीच्या १२७ हेक्टरवरील नुकसानीसाठी १० लाख १६ हजाररायगड जिल्ह्याला अवघी पाच कोटी १७ लाख १४ हजार इतकी नुकसानभरपाई मिळणार आहे.असे अंदाजे ३४ कोटींची नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात राज्य शासनाने सोमवारी ठाणे जिल्ह्यांकरीता अवघी आठ कोटी २० लाख ६८ हजार नुकसानभरपाई वितरीत करून संकटग्रस्त शेतकºयांच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळले आहे.राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांसाठी ही मदत दोन हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार इतकी आहे. यात शेतपिकांसाठी हेक्टरी ८ हजार तर फळबागांसाठी ती हेक्टरी १८ हजार इतकी तुटपुंजी आहे.77128 शेतकºयांचे अवेळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ४२ हजार ४२६.३१ हेक्टर शेतमालाचे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून यापोटी सुमारे ३४ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळावी, असा अहवाल पाठविला होता.३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्यांना भरपाई नाहीविशेष म्हणजे जी तुटपुंजी मदत केली आहे ती प्रचलित शासने नियमानुसार 33 टक्के किंवा त्याहून जास्त ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकºयांनाच मिळणार असून याठिकाणीही ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकºयांना कोणतीही नुकसान मिळणार नसल्याने शेतकºयांत संताप व्यक्त होत आहे.मच्छीमार मदतीच्या प्रतीक्षेतपालघरमध्ये शेतकºयांसह मच्छिमारांचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकºयांना तुटपुंजी मदत जाहिर करणाºया शासनाने मच्छिमारांना कोणतीच मदत वितरीत केलेली नाही. हिच अवस्था ठाणे जिल्ह्यातील मच्छिमारांचीही आहे. त्यांना नुकसानभरपार्ई कधी मिळणार, या प्रतीक्षेत दोन्ही जिल्ह्यांतील मच्छिमार आहेत.पालघर जिल्ह्यातही परतीच्या पावसाने सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जुन्या शासकीय निकषानुसार ३५ - ४० कोटी रु पयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तेथील जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. मात्र, प्रत्यक्षात पालघरच्या वाट्याला नऊ कोटी ७३ लाख आठ हजार रुपयांचीच नुकसानभरपाई शासनाने वितरीत केली आहे.दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतकºयांना सोडले वाºयावरअवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकºयांची १०० टक्के शेती नष्ट झाली असली तरी राज्य शासनाने मदत देतांना दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत वितरीत केली आहे. ज्यांचे दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्यांना त्यापेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई न देता शासनाने वाºयावर सोडले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी