शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

अंबरनाथमध्ये चोर सोडून संन्याशालाच फाशी

By admin | Updated: June 13, 2017 03:21 IST

शहरातील बेशिस्त रिक्षाचालक आणि बेकायदा व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या प्रामाणिक

- लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : शहरातील बेशिस्त रिक्षाचालक आणि बेकायदा व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या प्रामाणिक रिक्षाचालकाला पोलिसांच्या दबंगगिरीचाच सामना करावा लागला. वाहतूक पोलीस शिवाजी चौकात कार्यरत असतानाही रिक्षाचालक बेशिस्तपणा करत असल्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न या रिक्षाचालकाने केला होता. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई करण्यासाठी त्याला थेट पोलीस ठाण्यात नेले. अंबरनाथमधील वाहतूककोंडी दिवसेंदिवस वाढत असून शहरातील प्रमुख चौकांत होणाऱ्या कोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी चौक सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी रिक्षाचालक चुकीच्या पद्धतीने रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. रेल्वे स्थानकजवळ असल्याने शिवाजी चौकातून प्रवासी मोठ्या प्रमाणावर येजा करत असतात. येथील चौकात बेशिस्त रिक्षाचालकांनी काही वर्षांपासून बेकायदा थांबे उभारून त्यातून प्रवासी बसवण्यास सुरुवात केली होती. त्यात, रात्रीच्यावेळी हेच रिक्षाचालक चौकात प्रवासी उतरवून इतर प्रवासी भरण्यासाठी उभे राहतात. त्यामुळे पादचारी आणि इतर नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर, कारवाई करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून एक रिक्षाचालक आशीष देशपांडे करत आहेत. यावर काही ठोस होत नसताना याविरुद्ध प्रामाणिक रिक्षाचालकाने लढा उभारला आहे. बेशिस्त रिक्षाचालक, स्क्र ॅप रिक्षाचालक अशाविरुद्ध दोन वर्षांपासून वाहतूक पोलीस, रस्ते वाहतूक विभाग आणि पोलीस विभागाच्या कार्यालयात जाऊन न्याय मागणारे देशपांडे यांनी या बेशिस्त रिक्षाचालकांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलीस कर्तव्यावर असतानाही रिक्षाचालक आपला मुजोरपणा कायम ठेवत असल्याचे हे चित्रीकरण होते. या चित्रीकरणानंतर वाहतूक पोलीस या बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करेल, असे वाटत असताना या वाहतूक पोलिसांनी उलट देशपांडे यांनाच दमदाटी केली. यावेळी कोंडीच्या ठिकाणी न जाता चौकात उभ्या असलेल्या एका वाहतूक पोलिसाने देशपांडे यांना रागाच्या भरात रिक्षात कोंबले. देशपांडे यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले. मात्र, स्थानिक पोलिसांना देशपांडेंच्या हेतूबद्दल संशय नसल्याने त्यांनी देशपांडे यांना कोणतीही चौकशी न करता सोडले. याप्रकरणी अंबरनाथ वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धाटावकर यांना विचारले असता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची बाजू सावरत रिक्षाचालक हा चित्रीकरण करून कामात अडथळा निर्माण करत असल्याने त्याला पोलीस ठाण्यात नेले होते, असे स्पष्ट केले. देशपांडे हे बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात असल्याची कल्पना शिवाजीनगर पोलिसांना असल्याने त्यांनी देशपांडे यांना चौकशी न करता सोडून दिले. मात्र, बेशिस्त रिक्षाचालकांना संरक्षण देणाऱ्या संबंधित वाहतूक पोलिसावर कारवाईची मागणी होत आहे.