शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सर्वसामान्यांनी खबरदारी घेतली...आता तुम्ही जबाबदारी घ्या! : मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:24 IST

सर्वसामान्यांनी खबरदारी घेतली...आता तुम्ही जबाबदारी घ्या! - महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम परत द्या - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणीबाबत ठाणे जिल्हाधिकार्‍यांसोबत सकारात्मक चर्चा

ठळक मुद्देसर्वसामान्यांनी खबरदारी घेतली...आता तुम्ही जबाबदारी घ्या! - मनसे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम परत द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणीबाबत ठाणे जिल्हाधिकार्‍यांसोबत सकारात्मक चर्चा

ठाणे : कोरोना काळात मुख्यमंञी राज्यातील जनतेला 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' असे निक्षून सांगत होते. माञ तरीही हजारो सर्वसामान्य गरीब रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला नसून त्यांनी खाजगी रुग्णालयाची बिलं स्वत:च्या खिशातून भरलेली आहेत. या रुग्णांच्या बिलाची रक्कम योजनेच्या नियमानुसार धनादेशाद्वारे त्यांना परत मिळवून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज ठाणे जिल्हाधिकार्‍यांकडे केली. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली असून या मागणीचा सकारात्मक विचार होईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले आहे. 

ठाणे शहरातील महात्मा फुले योजनेतंर्गत येत असलेल्या रुग्णालयातील बेडची यादी जाहीर करण्याची मागणी मनसेसह बाकीच्या पक्षातील लोकप्रतिनिधींनी केली. माञ प्रशासन त्याला दाद देत नसून या लालफिती कारभारात गोरगरीब रुग्णांच्या खिशाला अव्वाच्या सव्वा बिलामार्फत काञी बसत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या कॅशलेस मेडिक्लेम योजनेत कंपनीला बिल सादर केल्यानंतर सर्व रुग्णांना रुग्णालयात भरलेल्या पैशांचा परतावा मिळतो. अगदी त्याच धर्तीवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम परत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली. याबाबत संदीप पाचंगे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनच सादर केले असून या योजनेतील ञुटी दूर करुन गोरगरीब रुग्णांना प्रशासनाने आधार देण्याची मागणी पाचंगे यांनी केली. या प्रकरणी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीचा विचार करुन त्याची लवकरच अमंलबजावणी करण्यासाठी पावलं उचलली जातील, असे मनसेच्या शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी मनविसेचे शहराध्यक्ष किरण पाटील उपस्थित होते.---------------------------------------------------------------किती रुग्णांची बिलं माफ केली जाहीर कराखासगी रुग्णालयांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत किती रुग्णांची बिलं माफ केली. या  संर्दभात यादी जाहीर करावी. दर्शनी भागात या योजनेतील अारक्षित बेडची यादी, मदतीसाठी संपर्क क्रमांक रुग्णालयाने जाहीर करावा. तरच गोरगरिब रुग्णांची कोरोनाकाळातील वणवण थांबणार आहे.- संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, मनविसे.  विभाग अध्यक्ष (ओवळा माजीवडा विधानसभा)

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेPoliticsराजकारण