शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या मंजुरीनंतरही जि.प.कडून शहापूरच्या १५ गावांचे रस्ते कागदावरच; गांवकरी संतप्त!

By सुरेश लोखंडे | Updated: April 14, 2024 18:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गमभागातील गांवाच्या विकासासाठी त्यांना रस्त्याशी जाेडणे गरजचे आहे. मात्र शहापूर तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गमभागातील गांवाच्या विकासासाठी त्यांना रस्त्याशी जाेडणे गरजचे आहे. मात्र शहापूर तालुक्यातील २७ गांवांना रह्तेच नसल्याचे लोकमतने वेळोवेळी उघड केले. त्यास अनुसरून श्रमजीवी संघटनेने आंदोलने छेडून प्रशासनाला जागे केले. वन विभागाला जाणीव करून देते १५ गावांच्या रस्त्यांचे दावे अखेर वनविभागने मंजूर केले. त्या रस्त्यांवर आजपर्यंतही ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून आतापर्यंत एक घमेले मातीही टाकली नसून कामाला सुरूवातही केली नसल्याचे श्रमजीवींचे संपर्कप्रमुख प्रकाश खाेडका यांनी लाेकमतला सांगितले.

वनविभागाकडून जागा दिली जात नाही. त्यामुळे शहापूरच्या ग्रामीण, दुर्गम भागातील रस्त्यांची कामे करता येत नसल्याची वल्गना ठाणे जिल्हा परिषदेने अतापर्यंत केली आहे. पण आदिवासी, गावकऱ्यांनी श्रमजीवीच्या माध्यमातून वनविभागाकडे सतत पाठपुरावा करीत अखेर १५ गावांच्या रस्त्यांसाठी वनविभागाकडून सहमती मिळवली. त्यास अनुसरून उद्भवणारी रस्त्यांची समस्या या पावसाळ्यात नक्की कमी हाेईल, अशी आशा असलेल्या गांवकऱ्यांची यंदाही फाेल ठरली आहे. एकाही गावाच्या रस्त्याचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले नसल्याची खंत खाेडका यांनी व्यक्त केली आणि श्रमदानातून आजपासून रस्त्याच्या कामाला सुरूवात केली आहे.

रस्ते सलेल्या या गावातील रहिवाश्यांना, रुग्ण, गरोदर माताना रुग्णालय गाठण्यापूर्वी जीव गमवावे लागले. शाळकरी मुलांना नदी, नाल्याच्या पुरातून मार्ग काढत शाळा गाठावी लागली. त्यांच्या या समस्यांना वाचा फोडण्यासाठी श्रमजीवीसारख्या सामाजिक संघटना व लोकमतने एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाचे, वनविभागाचे लक्ष वेधून घेत लोकप्रतिनिधींना जाणीव करून दिली. वनविभागाने २७ पैकी १५ गांवाच्या रस्त्यांसाठी जागा प्रस्तावाव्दारे मंजूर करुन घेतल्या. या गांवाना रस्त्याने जोडण्यासाठी वनविभागाने सहमती दिली आहे. या रस्याच्या जागेचा लाभ झालेल्यांमध्ये वेहलोंडे, बोरशेती-कळंबे, तळीचापाडा यांचा समावेश आहे, तर कुटेपाडा, जाधव पाडा, कातकरीवाडी,खुटघर,नडगांव,कोठारे, अजनूप,दळखण,टेंभा,वेहळोली,वेळुकचा पटकीपाडा, तरीचा पाडा आदी गांवांचा समावेश आहे.

या गावांच्या रस्यांची जागा वनविभागाने मंजूर केल्यामुळे गांवकर्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यावर जिल्हा परिषदेकडून या रस्त्याचे काम सुरू करणे अपेक्षित हाेते. एखाद्या रस्त्याचे काम हाती घेतले असते तरी गांवकऱ्याच्या आशा पल्लवीत झाल्या असत्या. पण त्यानुसार या गावाचा एकही रस्ता जिल्हा परिषदेला तयार करता आलेला नसल्यामुळे आदिवासी, गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अखेर त्यांनी श्रमदानातून अन्य गावाच्या रस्त्याचे काम हाती घेतल्याचे निदर्शनात आले आहे.