शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

जागेच्या मंजुरीनंतरही जि.प.कडून शहापूरच्या १५ गावांचे रस्ते कागदावरच; गांवकरी संतप्त!

By सुरेश लोखंडे | Updated: April 14, 2024 18:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गमभागातील गांवाच्या विकासासाठी त्यांना रस्त्याशी जाेडणे गरजचे आहे. मात्र शहापूर तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गमभागातील गांवाच्या विकासासाठी त्यांना रस्त्याशी जाेडणे गरजचे आहे. मात्र शहापूर तालुक्यातील २७ गांवांना रह्तेच नसल्याचे लोकमतने वेळोवेळी उघड केले. त्यास अनुसरून श्रमजीवी संघटनेने आंदोलने छेडून प्रशासनाला जागे केले. वन विभागाला जाणीव करून देते १५ गावांच्या रस्त्यांचे दावे अखेर वनविभागने मंजूर केले. त्या रस्त्यांवर आजपर्यंतही ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून आतापर्यंत एक घमेले मातीही टाकली नसून कामाला सुरूवातही केली नसल्याचे श्रमजीवींचे संपर्कप्रमुख प्रकाश खाेडका यांनी लाेकमतला सांगितले.

वनविभागाकडून जागा दिली जात नाही. त्यामुळे शहापूरच्या ग्रामीण, दुर्गम भागातील रस्त्यांची कामे करता येत नसल्याची वल्गना ठाणे जिल्हा परिषदेने अतापर्यंत केली आहे. पण आदिवासी, गावकऱ्यांनी श्रमजीवीच्या माध्यमातून वनविभागाकडे सतत पाठपुरावा करीत अखेर १५ गावांच्या रस्त्यांसाठी वनविभागाकडून सहमती मिळवली. त्यास अनुसरून उद्भवणारी रस्त्यांची समस्या या पावसाळ्यात नक्की कमी हाेईल, अशी आशा असलेल्या गांवकऱ्यांची यंदाही फाेल ठरली आहे. एकाही गावाच्या रस्त्याचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले नसल्याची खंत खाेडका यांनी व्यक्त केली आणि श्रमदानातून आजपासून रस्त्याच्या कामाला सुरूवात केली आहे.

रस्ते सलेल्या या गावातील रहिवाश्यांना, रुग्ण, गरोदर माताना रुग्णालय गाठण्यापूर्वी जीव गमवावे लागले. शाळकरी मुलांना नदी, नाल्याच्या पुरातून मार्ग काढत शाळा गाठावी लागली. त्यांच्या या समस्यांना वाचा फोडण्यासाठी श्रमजीवीसारख्या सामाजिक संघटना व लोकमतने एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाचे, वनविभागाचे लक्ष वेधून घेत लोकप्रतिनिधींना जाणीव करून दिली. वनविभागाने २७ पैकी १५ गांवाच्या रस्त्यांसाठी जागा प्रस्तावाव्दारे मंजूर करुन घेतल्या. या गांवाना रस्त्याने जोडण्यासाठी वनविभागाने सहमती दिली आहे. या रस्याच्या जागेचा लाभ झालेल्यांमध्ये वेहलोंडे, बोरशेती-कळंबे, तळीचापाडा यांचा समावेश आहे, तर कुटेपाडा, जाधव पाडा, कातकरीवाडी,खुटघर,नडगांव,कोठारे, अजनूप,दळखण,टेंभा,वेहळोली,वेळुकचा पटकीपाडा, तरीचा पाडा आदी गांवांचा समावेश आहे.

या गावांच्या रस्यांची जागा वनविभागाने मंजूर केल्यामुळे गांवकर्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यावर जिल्हा परिषदेकडून या रस्त्याचे काम सुरू करणे अपेक्षित हाेते. एखाद्या रस्त्याचे काम हाती घेतले असते तरी गांवकऱ्याच्या आशा पल्लवीत झाल्या असत्या. पण त्यानुसार या गावाचा एकही रस्ता जिल्हा परिषदेला तयार करता आलेला नसल्यामुळे आदिवासी, गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अखेर त्यांनी श्रमदानातून अन्य गावाच्या रस्त्याचे काम हाती घेतल्याचे निदर्शनात आले आहे.