शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भिवंडी महापालिकेमधील कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 23:36 IST

धोकादायक इमारतींत वास्तव्य । ५२५ कुटुंबांसमोर उभा आहे मृत्यू

नितीन पंडित।

भिवंडी : भिवंडीतील तीन मजली जिलानी इमारत कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी झाले होते. शहरात ७८२ अतिधोकादायक इमारती आजही उभ्या असून रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. अगदी पालिका कर्मचारीही धोकादायक इमारतीत राहत असून ५२५ कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे. वेळीच या कर्मचाºयांची अन्य ठिकाणी सोय न केल्यास जिलानीसारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती-१ ते ५ मध्ये पालिका कर्मचारी व अधिकाºयांसाठी ४६ निवासस्थाने आहेत. त्यांची सध्या दुरवस्था झाली असून ही निवासस्थाने धोकादायक स्थितीत असून पालिकेने त्यांना वारंवार नोटीस दिल्या, मात्र त्यांच्या राहण्याची सोय करण्याबाबत पर्याय शोधला नसल्याने निवासस्थाने रिकामी करण्यास कर्मचारी तयार नाहीत. शहरातील संगमपाडा येथील कर्मचारी वसाहतीत सुमारे १७२ कुटुंबे आहेत. कोंबडपाडा (५६ कुटुंबे), पद्मानगर (७२ कुटुंबे), धामणकरनाका फायर ब्र्रिगेड (१० कुटुंबे), वाजमोहल्ला (३२ कुटुंबे), वॉटर सप्लाय पद्मानगर (३६ कुटुंबे), कोटरगेट आझाद गार्डन (३२ कुटुंबे), भय्यासाहेब आंबेडकरनगर (१२ कुटुंबे), शिवाजीनगर भाजी मार्केट (४८ कुटुंबे), मिल्लतनगर, कामतघर, पद्मानगर प्रेमाताई हॉल, भावना मंगल कार्यालय ताडली, फेणेगाव, शास्त्रीनगर (१९ कुटुंबे), अजयनगर (१० कुटुंबे), फायर ब्रिगेड कासारआळी (८ कुटुंबे) अशी सुमारे ४६ निवासस्थाने कर्मचाºयांसाठी आहेत.विशेष म्हणजे यातील अनेक इमारती ३० ते ४० वर्षे जुन्या असून सध्या त्यांची दुरु स्ती न झाल्याने त्या दुरवस्थेत आहेत. अडगळीच्या ठिकाणी असलेल्या या घरांची व इमारतींची आयुक्त व पालिका अधिकाºयांनी पाहणी केली, मात्र तोडगा काढण्यास असमर्थ ठरल्याने ही निवासस्थाने आजही तशीच आहेत.प्रशासनाने या इमारतींवर दुरु स्तीच्या नावावर कोट्यवधी खर्च केला आहे. बहुतांश ठिकाणी प्लास्टर निघाले आहेत, तर काही इमारतींवर झाडे उगवली आहेत.तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्षकर्मचाºयांनी बांधकाम व उद्यान विभागाकडे तक्र ारी केल्या आहेत. मात्र, ती झाडे तोडली गेली नसल्याने इमारत कमकुवत झाली आहे, अशी माहिती कामगार संघटनेचे कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीचे महेंद्र कुंभारे, भानुदास भसाळे, श्रीपत तांबे, संतोष चौहान, भारत तांबे यांनी दिली आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, अशी माहिती कृती समितीच्या सदस्यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका