शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कोरोनाच्या काळात प्रशासनाचे एकदिलाने काम- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 01:03 IST

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्या संयमाची आणि जिद्दीची परीक्षा पाहणारा आहे. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, असेही ते म्हणाले.

ठाणे : कोरोनाच्या या संकटात आपण सर्वजण एकदिलाने एकत्र काम करीत आहोत. पुढील काळात प्रत्येकाने सुरक्षित सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, ही चतु:सूत्री दैनंदिन जीवनात अंगीकारली, तर आपण कोरोनावर मात करू शकतो, असा विश्वास नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्या संयमाची आणि जिद्दीची परीक्षा पाहणारा आहे. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, असेही ते म्हणाले.भारतीय स्वातंत्र्याचा ७३ वा वर्धापन दिन समारंभ शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. त्या प्रसंगी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, ठाणे मनपा आयुक्त बिपिन शर्मा, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती.शिंदे म्हणाले की, आपण कोरोनाशी सगळे बळ, सर्व साधनसामग्री एकवटून लढतोय आणि मुख्य म्हणजे त्यात यशस्वी होतोय. मुंबई, ठाणे तसेचएमएमआर शहरांमधील गेल्या काही दिवसांमधली रुग्णांची आकडेवारी दिलासादायक आहे.नव्या रु ग्णसंख्येचा आलेख सातत्याने खाली येतोय. त्याचवेळी रु ग्ण बरे होण्याचा दर, रु ग्णसंख्या दुपटीचा कालावधी सातत्याने वाढतोय. मृत्युदर कमी करण्यात आपण यश मिळवतोय. जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महापालिका प्रशासन यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ग्लोबल हॉस्पिटल, त्यापाठोपाठ नवी मुंबईत वाशी येथे सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये सिडकोच्या माध्यमातून एक हजार २०० बेड्सचे रु ग्णालय उभे राहिले. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, मीरा रोड, भार्इंदर, भिवंडी अशा सर्वच शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागांत कुठे २००, तर कुठे ७०० बेड्स अशा क्षमतेची रु ग्णालये उभारण्यात आली, असे त्यांनीनमूद केले.सर्व जातीधर्मांच्या बांधवांनी यंदा अतिशय साधेपणाने सण, उत्सव साजरे करून शासनाला सहकार्य केले. आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच अन्य सण शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरे करावेत, असे आवाहन शिंदे यांनी केले.ध्वजारोहणानंतर शिंदे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, कोरोनायोद्धे, विद्यार्थी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.>आपत्ती प्रतिसाद निधीतून ८६ कोटी मिळाले!जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी यंदा जिल्हा वार्षिक निधीतून आतापर्यंत २२ कोटी रु पये जिल्हा सामान्यरु ग्णालय तसेच महापालिकांना देण्यात आले आहे. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ८६ कोटी रु पये जिल्ह्यास उपलब्ध झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.सर्व आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी निधीतून सुमारे साडेसात कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला कोरोनासाठी उपलब्ध करून दिले. या निधीतून आरोग्य सुविधा बळकट करण्यात येत आहे. एक कोटी ९६ लाख गरजंूना अन्नपाकीटवाटप करण्यासाठी हजारो हात पुढे आले. परराज्यांतील मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचवण्याचे शिवधनुष्य जिल्हा व पोलीस प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पेलले. ठाणे जिल्ह्यातून विविध राज्यांसाठी ८० रेल्वेगाड्या रवाना झाल्या. तसेच जिल्ह्यातून पाच हजार ७०० बसगाड्यांद्वारे श्रमिकांना त्यांच्या गावी सोडण्यात आले.