शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर खाद्यतेलाच्या किमतीत घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

मुरलीधर भवार लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. मागच्यावर्षी वाढलेले खाद्यतेलाचे भाव ...

मुरलीधर भवार

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. मागच्यावर्षी वाढलेले खाद्यतेलाचे भाव जुलैपर्यंत आणखी वाढतील, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. मात्र जूनमध्ये भाव कमी झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

खाद्यतेलात शेंगदाणा तेलाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आता खाद्यतेलाचे दर कमी झाले असले तरी, अन्य तेलाच्या तुलनेत शेंगदाणा तेलाचे दर स्थिर आहेत. सूर्यफूल, सोयाबीन, पाम आणि राइस ब्रॅन या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. त्यातही राईचे तेल हे सगळ्य़ात जास्त महाग होते. त्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात उत्तर भारतीय करतात. महाराष्ट्रीय लोक शेंगदाणा तेलाला आधी प्राधान्य देतात. अन्य सूर्यफूल, राइस ब्रॅन यांना नंतरचे प्राधान्य आहे. मध्यमवर्गीय ग्राहक सोडला, तर सगळीकडे रिफाइंड तेल खाण्यावर जास्त भर असतो. त्यातही सामान्यांची पसंती ही पाम तेलाला अधिक असते.

कोरोना काळात अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप सामाजिक संस्था व राजकीय पक्षांकडून केले गेले. त्यात पाम तेलाचे एक ते दोन लिटरचे पॅकेट जास्त खरेदी करून दिले गेले. त्यामुळे पाम तेलाची विक्री जास्त झाली होती. कोरोना काळात नागरिकांच्या हातचे काम गेले. अनेकांना पगार कपात सहन करावी लागली. त्यामुळे सरकारने जीवनाश्यवक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले पाहिजेत, अशी माफक अपेक्षा होती. कोरोना काळात जीवनाश्यक वस्तूंचे भाव वाढले. त्यात खाद्यतेलही महागले होते. त्यामुळे महिलांचे घरचे बजेट कोलमडले होते. खाद्यतेलावरील कर कमी केल्याने आता कुठे किमती घसरल्या आहेत. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. मात्र कमी झालेले भाव यापुढेही स्थिर राहावेत, अशी माफक अपेक्षा महिला वर्गाकडून केली जात आहे.

-------------------------

गृहिणींना मिळाला थोडासा दिलासा

कोरोना काळात तेलाला भाववाढीची चांगलीच फोडणी बसली होती. त्यामुळे आमच्या घरातील तेलाचे बजेट कोलमडले होते. त्यामुळे तेल वापरताना हात आखडता घेतला जात होता. आता तेलाचे भाव कमी झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, पुन्हा तेलाचे भाव वाढविले जाऊ नयेत, अशी अपेक्षा नागरिक सरकारकडून व्यक्त करत आहेत.

---------------------

शेतकरी प्रतिक्रिया...

१. आमची नाशिकला भुईमुगाची शेती आहे. शेतातील भुईमूग सुकवून त्यानंतर त्यातील दाणे काढून शेंगदाणा तेलासाठी त्याचा उपयोग करतो. मात्र शेंगदाणा तेलाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे या भाववाढीचा आणि भाव कमी केल्याचा आम्हाला काहीएक फायदा झाला नाही.

- सुरेश निचळ

२. आम्ही सूर्यफुलाचे पीक घेतो. त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते. मागच्यावर्षी कोरोना काळात सूर्यफुलाच्या तेलाचे भाव वाढले होते. ते जुलैमध्येही वाढतील, अशी अपेक्षा होती. पण आता कमी झाल्याने आमच्या पदरी पुन्हा कमीच पैसे मिळणार आहेत.

- दाजीबा सोपान

---------------------------

प्रति लिटर तेलाचे आताचे दर...

सूर्यफूल - १५५ रुपये

सोयाबीन - १३५ रुपये

शेंगदाणा - १६५ रुपये

पाम - ११५ रुपये

राइसब्रॅन - १५५ रुपये

---------------------

याआधीचे दर...

सूर्यफूल - १७५ रुपये

सोयाबीन - १५९ रुपये

शेंगदाणा - १६० रुपये

पाम-१३५ रुपये

राइसब्रॅन-१८० रुपये

----------------------