शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात लहान मुले झाली ‘मोटू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क स्नेहा पावसकर ठाणे : गेल्या वर्षभराहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा तर बंदच आहेत. पण सुरक्षेच्या कारणास्तव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

स्नेहा पावसकर

ठाणे : गेल्या वर्षभराहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा तर बंदच आहेत. पण सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांश पालक मुलांना घराबाहेर नेत नाहीत. खेळ नाही, चालणं नाही की कुठे बाहेर फिरणं नाही. या सगळ्याचा परिणाम लहान मुलांच्या वजनावर झालेला दिसतो. सर्रास मुले ही मोटू अर्थात आपल्या वयाच्या तुलनेत जाड झालेली दिसतात.

लॉकडाऊनमुळे घरात बसून अनेकांच्या वजन वाढल्याच्या तक्रारी ऐकायला मिळताहेत. यातून लहान मुलेही सुटलेली नाहीत. पूर्वी शाळा, क्लासेस, विविध ॲक्टिव्हिटी कोर्स यामुळे मुलांचे घराबाहेर चालणे, फिरणे होत असे. मात्र, गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाने सगळ्यांची लाईफस्टाईलच बदलली. शाळा, क्लासेस घरातच बसून ऑनलाईन होतात. तेही कमी वेळ असल्याने मुलांवर अभ्यासाचा ताण नाही. तर कोरोनाच्या धास्तीने बरेच पालक मुलांना घराबाहेर खेळायलाही पाठवित नाहीत. घरात बसून हवे तर मोबाईल बघ, टीव्ही बघ, पण बाहेर जायचं नाही, अशीच पालकांची ताकीद मुलांना असते, त्यामुळे मुले पण दिवसभर मोबाईल आणि टीव्हीच्या समोर बसलेली दिसतात. त्यामुळे मुले आळशीही झालीत आणि केवळ बसून आणि बसून जाड पण झालीत.

--------

---------------

का वाढले वजन ?

मुले केवळ घरात बसून आहेत. चालणे, फिरणे, मैदानी खेळ खेळणे होत नाही.

दिवसभर घरात बसलेल्या मुलांसाठी आपण पालक त्यांना हवे त्या खाण्यापिण्याच्या वस्तू आणून देतो.

प्रिझर्व्हेटिव्ह पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, फास्टफूडचा दैनंदिन खाण्यातील वापर आपला वाढला आहे.

गरजेपेक्षा काही मुले जास्त वेळ झोपतात.

------------

वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी -

मुलांना घराबाहेर तर पाठविता येत नाही. पण सकाळच्यावेळी आपल्या सोसायटीच्या आवारात गर्दी कमी असेल अशा ठिकाणी, जवळच्याच गार्डनमध्ये आपल्यासोबत मुलांना ५ ते १० मिनिटासाठी नेता येईल. यामुळे मुलांचा कंटाळा दूर होईल.

मुलांना सकाळी लवकर उठवून रात्री लवकर झोपण्याची सवय लावावी.

दिवसभर मोबाईल हातात देण्यापेक्षा मुलांशी इतर बैठे पण बुद्धिला चालना देणारे खेळ खेळा.

घरातल्या घरात मुलांना उड्या मारायला लावा, चालायला लावावे.

बिल्डिंगमध्ये राहत असाल तर मुलांना दररोज किमान २५ पायऱ्या चढउतार करायला लावावे.

---------------

पालकांच्या प्रतिक्रिया

मुलं घरात बसून कंटाळली आहेत. पण बाहेर अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे मुले घरात चिडचिड करण्यापेक्षा मोबाइलमध्ये रमतात. ते त्यांच्या शारिरिक स्थैर्यासाठी योग्य नसले तरी मुलांना विरंगुळा म्हणून फोन द्यावा लागतो.

- कीर्ती रावदंडे, पालक

----------------

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तर मुलांना जास्त धोका वर्तविला आहे. त्यामुळे यंदाही शाळा लवकर सुरू होण्याची चिन्हे नाहीत. पण घरात बसून परिणामी मुलांचे वजन वाढते आहे. तर मोबाईल बघण्याचा हट्ट मुलांचा असतो. म्हणजे या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मुले घरात बसून हट्टी, मोबाईलवेडी आणि लठ्ठ पण होऊ लागली आहेत.

- प्रथमेश गाेरोले, पालक

---------

--------------

सतत घरात बसून, शरीराला कोणताही व्यायाम नसल्याने अनेक मुलांचे वजन वाढते आहे. मात्र, मुलांना घरात नियमित थोडावेळ तरी योगासने करायला लावावीत. शिक्षणासाठी सोडून मोबाईल, टीव्ही या माध्यमांचा वापर दिवसभरात जास्तीत जास्त एक तास असावा. त्याचबरोबर मुलांचा आहार समतोल असावा. जंकफूड, स्निग्ध पदार्थ, तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन टाळावे.

- डॉ. गीता खरे,