शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

डम्पिंगचा भडका, दिव्यात धूर, भिवंडी परिसर घुसमटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 03:19 IST

औरंगाबादमधील डम्पिंगला पेटलेला प्रश्न शमतो न शमतो तोच ठाणे जिल्ह्यातील डम्पिंगला लागलेल्या आगीमुळे लाखो नागरिकांचा जीव घुसमटतो आहे. कल्याणच्या आधारवाडीची आग कशीबशी शमू लागली आहे, तर दिव्यातील डम्पिंगची आग नव्याने भडकली आहे.

ठाणे : औरंगाबादमधील डम्पिंगला पेटलेला प्रश्न शमतो न शमतो तोच ठाणे जिल्ह्यातील डम्पिंगला लागलेल्या आगीमुळे लाखो नागरिकांचा जीव घुसमटतो आहे. कल्याणच्या आधारवाडीची आग कशीबशी शमू लागली आहे, तर दिव्यातील डम्पिंगची आग नव्याने भडकली आहे. त्याचवेळी भिवंडीच्या गायत्रीनगरचा कचराही पेटला आहे. उल्हासनगर, बदलापूरच्या डम्पिंगच्या दुर्गंधीचा प्रश्नही धुमसतो आहे.या सर्व ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्न दीर्घकाळ रेंगाळला आहे. एकही महापालिका कचºयाचे नेमके वर्गीकरण करण्यात अपयशी ठरली आहे. ओल्या-सुक्या कचºयाबरोबरच मेडिकल वेस्ट, ई कचरा यांचेही आव्हान तसेच आहे.दिव्यातील डम्पिंगवरील कचºयाने बुधवारी रात्री पुन्हा मोठ्या प्रमाणात पेट घेतला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न गुरुवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. गेल्या आठवड्यात ८ मार्चला येथे आग लागली होती. तेव्हा धुराचे प्रचंड लोट उठले होते. तेव्हापासून आग धुमसत असताना १४ मार्चच्या रात्री पुन्हा आग लागली. त्यामुळे दिवा परिसरात धूर पसरला आणि नागरिकांचा श्वास कोंडला. आग रौद्र रूप धारण करण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्रिशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. ही आग विझवण्याचे काम मध्यरात्री तीन वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर, गुरुवारी सकाळी पुन्हा आग भडकल्यावर परत दोन गाड्या पाठवण्यात आल्या. दुपारनंतर पुन्हा अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी काम सुरू केले, पण अद्यापही आग आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.>भिवंडीतही कचºयामुळे धुराचे साम्राज्यभिवंडी : भिवंडीतील नागाव-गायत्रीनगरमधील डम्प्ािंगला बुधवारी रात्री लागलेल्या आगीने परिसरांतील नागरिकांचा श्वास कोंडला. या भागात मोठ्या संख्येने कामगार, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबे राहात असून त्यांना या धुरामुळे रात्रभर श्वास कोंडणे, दम लागणे, डोळ्यांची आग होणे असे त्रास सहन करावे लागले. वाºयामुळे हा धूर मैलभर अंतरावरील नागाव व आझादनगर या ठिकाणापर्यंत पसरला. डम्पिंग ग्राऊंड बंद करू, अशी आश्वासने देत येथील नगरसेवक निवडून येतात. पण येथील डम्पिंग गेल्या दहा वर्षांत हटलेले नाही. त्यामुळे विविध संघटनांनी हा विषय हाती घेत आंदोलने सुरू केली. त्यानंतरही हा प्रश्न सुटला नसून अधिक चिघळल्याचे या आगीमुळे दिसून आले.भिवंडी पालिका क्षेत्रात १० ते १२ लाखांची वस्ती आहे. कापड कारखाने आहेत. येथे दररोज सुमारे ३५० मेट्रिक टन कचरा साठतो. त्यासाठी पालिकेमार्फत दरमहा एक कोटी ४० लाखापेक्षा जास्त खर्च होत असूनही प्रशासन व नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे गायत्रीनगरच्या डम्प्ािंगचा प्रश्न सुटलेला नाही. पालिकेने शहरातील ओला व सुका कचरा नेण्यासाठी ठेकेदार नेमले. पण त्यांच्याकडे वेगवेगळा कचरा गोळा करण्याची साधने नाहीत. त्यामुळे ठेकेदार घंटागाडीतून व कचराकुंडीव्दारे ओला व सुका कचरा एकत्र करून टाकतात. तो टाकण्यासाठी पालिकेकडे जागा नसल्याने नागाव-गायत्रीनगर येथील सीटी पार्कच्या जागेवर हा कचरा जमा केला जातो. त्यामुळे परिसरांत दुर्गंधी पसरली आहे. हे डम्प्ािंग बंद करण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन पुकारले होते. परंतु त्यावर पालिका प्रशासनाने कोणताही तोडगा काढलेला नाही.