शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

डम्पिंगचा भडका, दिव्यात धूर, भिवंडी परिसर घुसमटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 03:19 IST

औरंगाबादमधील डम्पिंगला पेटलेला प्रश्न शमतो न शमतो तोच ठाणे जिल्ह्यातील डम्पिंगला लागलेल्या आगीमुळे लाखो नागरिकांचा जीव घुसमटतो आहे. कल्याणच्या आधारवाडीची आग कशीबशी शमू लागली आहे, तर दिव्यातील डम्पिंगची आग नव्याने भडकली आहे.

ठाणे : औरंगाबादमधील डम्पिंगला पेटलेला प्रश्न शमतो न शमतो तोच ठाणे जिल्ह्यातील डम्पिंगला लागलेल्या आगीमुळे लाखो नागरिकांचा जीव घुसमटतो आहे. कल्याणच्या आधारवाडीची आग कशीबशी शमू लागली आहे, तर दिव्यातील डम्पिंगची आग नव्याने भडकली आहे. त्याचवेळी भिवंडीच्या गायत्रीनगरचा कचराही पेटला आहे. उल्हासनगर, बदलापूरच्या डम्पिंगच्या दुर्गंधीचा प्रश्नही धुमसतो आहे.या सर्व ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्न दीर्घकाळ रेंगाळला आहे. एकही महापालिका कचºयाचे नेमके वर्गीकरण करण्यात अपयशी ठरली आहे. ओल्या-सुक्या कचºयाबरोबरच मेडिकल वेस्ट, ई कचरा यांचेही आव्हान तसेच आहे.दिव्यातील डम्पिंगवरील कचºयाने बुधवारी रात्री पुन्हा मोठ्या प्रमाणात पेट घेतला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न गुरुवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. गेल्या आठवड्यात ८ मार्चला येथे आग लागली होती. तेव्हा धुराचे प्रचंड लोट उठले होते. तेव्हापासून आग धुमसत असताना १४ मार्चच्या रात्री पुन्हा आग लागली. त्यामुळे दिवा परिसरात धूर पसरला आणि नागरिकांचा श्वास कोंडला. आग रौद्र रूप धारण करण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्रिशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. ही आग विझवण्याचे काम मध्यरात्री तीन वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर, गुरुवारी सकाळी पुन्हा आग भडकल्यावर परत दोन गाड्या पाठवण्यात आल्या. दुपारनंतर पुन्हा अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी काम सुरू केले, पण अद्यापही आग आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.>भिवंडीतही कचºयामुळे धुराचे साम्राज्यभिवंडी : भिवंडीतील नागाव-गायत्रीनगरमधील डम्प्ािंगला बुधवारी रात्री लागलेल्या आगीने परिसरांतील नागरिकांचा श्वास कोंडला. या भागात मोठ्या संख्येने कामगार, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबे राहात असून त्यांना या धुरामुळे रात्रभर श्वास कोंडणे, दम लागणे, डोळ्यांची आग होणे असे त्रास सहन करावे लागले. वाºयामुळे हा धूर मैलभर अंतरावरील नागाव व आझादनगर या ठिकाणापर्यंत पसरला. डम्पिंग ग्राऊंड बंद करू, अशी आश्वासने देत येथील नगरसेवक निवडून येतात. पण येथील डम्पिंग गेल्या दहा वर्षांत हटलेले नाही. त्यामुळे विविध संघटनांनी हा विषय हाती घेत आंदोलने सुरू केली. त्यानंतरही हा प्रश्न सुटला नसून अधिक चिघळल्याचे या आगीमुळे दिसून आले.भिवंडी पालिका क्षेत्रात १० ते १२ लाखांची वस्ती आहे. कापड कारखाने आहेत. येथे दररोज सुमारे ३५० मेट्रिक टन कचरा साठतो. त्यासाठी पालिकेमार्फत दरमहा एक कोटी ४० लाखापेक्षा जास्त खर्च होत असूनही प्रशासन व नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे गायत्रीनगरच्या डम्प्ािंगचा प्रश्न सुटलेला नाही. पालिकेने शहरातील ओला व सुका कचरा नेण्यासाठी ठेकेदार नेमले. पण त्यांच्याकडे वेगवेगळा कचरा गोळा करण्याची साधने नाहीत. त्यामुळे ठेकेदार घंटागाडीतून व कचराकुंडीव्दारे ओला व सुका कचरा एकत्र करून टाकतात. तो टाकण्यासाठी पालिकेकडे जागा नसल्याने नागाव-गायत्रीनगर येथील सीटी पार्कच्या जागेवर हा कचरा जमा केला जातो. त्यामुळे परिसरांत दुर्गंधी पसरली आहे. हे डम्प्ािंग बंद करण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन पुकारले होते. परंतु त्यावर पालिका प्रशासनाने कोणताही तोडगा काढलेला नाही.