शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

अंबरनाथमधील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 5:52 AM

अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतींमुळे हजारो कामगार दररोज अंबरनाथ स्थानक ते आनंदनगर औद्योगिक वसाहतीपर्यंत वाहतूक करतात.

अंबरनाथ: अंबरनाथच्या लोकनगरी पुलापासून ते थेट स्वामी समर्थ चौकापर्यंत जाणारा अंबरनाथचा पहिला बाह्यवळण रस्ता पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच येथून वाहतूक सुरू झाल्याने मातीच्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. त्यामुळे आसपासच्या निवासी संकुलांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आधी रस्ता पूर्ण करा, मगच वाहतुकीसाठी खुला करा, अशी मागणी आता रहिवाशांकडून होत आहे.

अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतींमुळे हजारो कामगार दररोज अंबरनाथ स्थानक ते आनंदनगर औद्योगिक वसाहतीपर्यंत वाहतूक करतात. कामगारांसाठी बस कंपन्यांमार्फत दिल्या आहेत. यांची वाहतूक मुख्य शहरातून होत असल्याने वाहनांमुळे वडवली ते आनंदनगरपर्यंत मोठी वाहतूककोंडी होते. त्यात वडवली ते लोकनगरीच्या या महत्त्वाच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे कंपन्यांच्या बस जाण्यासाठी पर्यायी मार्ग काढण्यात येत आहे.लोकनगरी पूल ते गोविंद पूलमार्गे स्वामी समर्थ चौकापर्यंतच्या पहिल्या बाह्यवळण रस्त्याची उभारणी केली जात आहे. याच्या आरेखनबदलाला एमएमआरडीएनेही मंजुरी दिल्याने त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, या रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने आसपासचे दुकानदार, नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. या रस्त्याचे काम करण्यासाठी येथे सुरुवातीला मातीची भर घालण्यात आली. मात्र, अचानक मोठे ट्रक, बस अशा अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. हीच धूळ शेजारी असलेल्या रहिवासी संकुलांत जात आहे. यासाठी आता नागरिकांनी पालिका प्रशासनाला येथील वाहतूक थांबवण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली असल्याची माहिती येथील दुकानदार संतोष महाडेश्वर यांनी दिली आहे. या धुळीमुळे इतर छोटी वाहने या रस्त्यावरून प्रवास करू शकत नाही. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता रहदारीसाठी खुला करू नये, अशी मागणी आता होत आहे.

लोकनगरी ते स्वामी समर्थ चौक या रस्त्याचे सध्या मजबुतीकरण केले आहे. याच रस्त्याचे काम एमएमआरडीएमार्फत केले जाणार आहे. मात्र, शिवाजी चौक ते वडवली या रस्त्याचे काम सुरू असल्याने जड वाहतूक या कच्च्या रस्त्यावरून सुरू केली आहे. त्याचा फटका आता स्थानिकांना बसत आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करताना किमान त्या ठिकाणी धूळ उडणार नाही, अशी व्यवस्था करण्याची गरज होती. 

टॅग्स :thaneठाणे