शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

बदलापूरच्या आगीवेळी बसला पाणी कपातीचा फटका; बंब झाले रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 6:06 PM

बदलापुरातील कंपनीला आग लागल्यावर सर्वात आधी बदलापूरची अग्निशमन गाडी घटनास्थळी गेली. मात्र, आग भडकलेली असल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा अखंडीत पुरवठा गरजेचे होता.

- पंकज पाटील

बदलापूर : बदलापुरातील मानकिवली गावाला लागुन असलेल्या एमआयडीसी भागात छपाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या प्लॅटीनम पॉलीमोर या कंपनीला भीषण आग लागली. कंपनीपासून काही अंतरावरच कुळगांव-बदलापूर पालिकेचे अग्नीशमन केंद्र आहे. घटनास्थळी पालिकेचे बंब वेळेत देखील पोहचले. मात्र, पालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाण्याची कमतरता भासल्याने आग आटोक्यात आणता आली नाही. भरलेल्या बंबातून जेवढे नियंत्रण मिळविणे शक्य झाले तेवढेच काम सुरुवातीला झाले. मात्र, अग्निशमन बंबाला पाणी पुरवठा करण्यासाठी लागणारे टँकर भरले गेलेच नाहीत. शुक्रवारी एमआयडीसी भागात पाणी कपात असल्याने त्या परिसरातील पाणी पुरवठा हा पूर्ण बंद ठेवण्यात येत असल्याने पाणी कपातीचा फटका या कंपनीला सर्वाधिक बसला.

 बदलापुरातील कंपनीला आग लागल्यावर सर्वात आधी बदलापूरची अग्निशमन गाडी घटनास्थळी गेली. मात्र, आग भडकलेली असल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा अखंडीत पुरवठा गरजेचे होता. मात्र, पाणी कपातीमुळे गुरवारी रात्रीपासुनच पाणी पुरवठा बंद राहत असल्याने शुक्रवारी आग लागल्यावर ती आटोक्यात आणण्यासाठी पाणी कमी पडले. अग्नीशमन बंबाला टँकरने पाणी पुरवठा गरजेचे होते. मात्र, एमआयडीसी भागात पाणी बंद असल्याने टँकरला इतर ठिकाणाहुन पाणी भरुन आणावे लागत होते. अनेकवेळा पाण्याअभावी अग्नीशमन विभागाचे कर्मचारी हे केवळ पाण्याची वाट बघत बसले होते. आग मोठी असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशमन बंबासोबत टँकरचीही गरज होती. वेळेवर टँकर आले देखील मात्र हे टँकर भरण्यासाठी जागा नसल्याने घोळ झाला. सुदैवाने जीवन प्राधिकरणाचा पाणी पुरवठा सुरू असल्याने काही प्रमाणात पाण्याची कमतरता कमी झाली. मात्र, पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध न झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड जात होते. 

  पाण्यासोबतच बघ्यांचाही त्रास मोठय़ा प्रमाणात झाला. आग पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक एकत्रित आले होते. ही गर्दी आवरण्यातच प्रशासनाचा सर्वाधिक वेळ जात होता. पोलीस प्रशासनालाही गर्दीवरच लक्ष केंद्रीत करुन बसावे लागले. आग लागल्यावर काही स्फोट कंपनीत झाल्याने घातक रसायन असल्याची जाणिव अग्नीशमन विभागाला झाल्याने मोठी हानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे अग्निशमन विभागाचे कर्मचारी हे देखील सतर्क राहुन काम करत होते. 

  आजच्या आगीच्या घटनेमुळे आपत्कालीन स्थितीत पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने अग्नीशमन यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे समोर आले आहे. पाणी कपातीचे धोरण हे शासन स्तरावरील असले तरी आपत्कालीन स्थितीत पाण्याचा पर्यायी व्यवस्था नसल्याचे आजच्या आगीच्या घटनेवरुन स्पष्ट दिसत आहे.

टॅग्स :fireआगbadlapurबदलापूर