शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

मुलाने चप्पल हरवल्याने आईची आत्महत्या, रागाच्या भरात दिला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 6:13 AM

लहान मुलाने चप्पल हरवल्याने वडील त्याला नवीन चप्पल आणण्यासाठी बाहेर घेऊन गेले. याचदरम्यान मोठ्या मुलाला खेळण्यासाठी बाहेर पाठवून, दिवाळी पाडव्याच्या दिवशी (शुक्र वारी दुपारी) आईने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली.

ठाणे : लहान मुलाने चप्पल हरवल्याने वडील त्याला नवीन चप्पल आणण्यासाठी बाहेर घेऊन गेले. याचदरम्यान मोठ्या मुलाला खेळण्यासाठी बाहेर पाठवून, दिवाळी पाडव्याच्या दिवशी (शुक्र वारी दुपारी) आईने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली. वृषाली पांडुरंग गुंजकर (३२) असे महिलेचे नाव आहे. पाडव्याच्या दिवशी तिचा मामेभाऊ भाऊबिजेला आला असताना हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.मयत वृषाली या पती पांडुरंग आणि दोन मुलांसह ठाण्यातील काजूवाडी येथे राहात होत्या. त्या स्वभावाने तापट होत्या. छोट्या-छोट्या कारणावरून त्या वाद घालायच्या. शुक्रवारी दिवाळी पाडवा होता. याच दिवशी त्यांचा लहान मुलगा चप्पल हरवून घरी आला. त्यातच घरी आल्यावर त्याने फटाक्यांची मागणी केली. त्यामुळे वृषाली यांचा पारा चढला आणि त्या मुलावर चिडल्या. दरम्यान, बीआरसीमध्ये असलेले पांडुरंग हे त्या मुलाला घेऊन नवीन चप्पल आणण्यासाठी बाहेर पडत असताना, तुम्ही मुलांचे जास्त लाड करता, असे म्हणून त्या आणखी भडकल्या. तरीही पांडुरंग हे त्या मुलाला घेऊन बाहेर पडले. त्यानंतर, वृषाली यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला घराबाहेर खेळण्यासाठी पाठवून दिले व घरात कोणी नसताना, पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.पांडुरंग गुंजकर मुलासह परतले, तेव्हा दार आतून बंद होते. त्यांनी भाऊबिजेसाठी आलेल्या वृषाली यांच्या मामेभावाच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा वृषाली यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबत तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याthaneठाणे