शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पुरामुळे ठाणे जिल्ह्यात झाली लाखोंची हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 02:20 IST

पूरग्रस्तांचे तीन हजार पंचनामे पूर्ण : राबोडीत इमारतीचा

ठळक मुद्देभाग कोसळला, उल्हासनगरला ११० घरांमध्ये पाणी

सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार या पूरपरिस्थितीच्या काळात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून सोमवारपासून करण्यास प्रारंभ केला आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत दोन हजार ७१५ पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील या घरांसह शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तहसीलदारांकडून सुरू आहेत. याप्रमाणेच सोमवारी दुपारीही राबोडीतील इमारतीचा भाग कोसळला, तर उल्हासनगरमध्ये ११० घरांमध्ये पाणी शिरले आहे.

जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचा जोर वाढला होता. यादरम्यान राबोडी येथील पंचगंगा इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या इमारतीत रहिवासी असतानाही हा भाग कोसळला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २० मधील अशोक पाटील कॉलनीत सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे ११० घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे येथील रहिवाशांचे हाल झाले. कल्याण तालुक्यातील रायता गावाजवळील दिनेशकुमार ढेरिया यांच्या डेअरी फार्ममधील १६ गायी, सात वासरे आदी सुमारे २९ जनावरे शुक्रवारच्या रात्री पुरात वाहून गेले आहेत. त्यांचे मृतावशेष मिळाले नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून स्पष्ट करण्यात आले.बदलापूर शहरात सर्वाधिक नुकसानया पूरपरिस्थितीच्या कालावधीत अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहरास सर्वाधिक फटका बसला आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे रहिवाशांना जीवघेण्या समस्येला तोंड द्यावे लागले. याप्रमाणेच उल्हासनगरमधील वालधुनी नदीकाठावरील घरांमध्येदेखील पुराचे पाणी शिरले आहे. तर, कल्याण, भिवंडीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुरबाड, शहापूर तालुक्यांतही नदीकाठालगतच्या भातशेतीचे नुकसान झाले. या पूरस्थितीच्या दोन दिवसांच्या कालावधीत लाखो रुपयांचे नुकसान सद्य:स्थितीत दिसून येत आहे. यांचे नुकसानभरपाईच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे आदेश जारी झाले. त्यानुसार, संध्याकाळपर्यंत दोन हजार ७०० पेक्षा अधिक पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्याचे आढळून आले.अंबरनाथमध्ये शेकडो एकर शेतजमीन पाण्याखालीअंबरनाथ तालुक्यातील रेल्वेच्या काकोळे धरणातील पाणी खालच्या बंधाऱ्यात शिरून ब्रिटिशकालीन भिंतीला भगदाड पडले. यामुळे या परिसरातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. यासारखे शेतीनुकसानीसह घरांच्या पडझडीचे पंचनामे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तहसीलदार यंत्रणेकडून पंचनाम्यास प्रारंभ केला आहे. अंबरनाथ तालुक्यात आतापर्यंत एक हजार ५०० पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित पंचनामे सुरू आहेत. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यात ९७० पंचनाम्यांचे काम झाले. भिवंडीत आतापर्यंत २४५ पंचनामे संध्याकाळपर्यंत झाले. महसूल विभागाकडून युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तालुक्यांमध्ये सुरू आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMumbaiमुंबई