शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे ठाणे जिल्ह्यात झाली लाखोंची हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 02:20 IST

पूरग्रस्तांचे तीन हजार पंचनामे पूर्ण : राबोडीत इमारतीचा

ठळक मुद्देभाग कोसळला, उल्हासनगरला ११० घरांमध्ये पाणी

सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार या पूरपरिस्थितीच्या काळात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून सोमवारपासून करण्यास प्रारंभ केला आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत दोन हजार ७१५ पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील या घरांसह शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तहसीलदारांकडून सुरू आहेत. याप्रमाणेच सोमवारी दुपारीही राबोडीतील इमारतीचा भाग कोसळला, तर उल्हासनगरमध्ये ११० घरांमध्ये पाणी शिरले आहे.

जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचा जोर वाढला होता. यादरम्यान राबोडी येथील पंचगंगा इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या इमारतीत रहिवासी असतानाही हा भाग कोसळला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २० मधील अशोक पाटील कॉलनीत सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे ११० घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे येथील रहिवाशांचे हाल झाले. कल्याण तालुक्यातील रायता गावाजवळील दिनेशकुमार ढेरिया यांच्या डेअरी फार्ममधील १६ गायी, सात वासरे आदी सुमारे २९ जनावरे शुक्रवारच्या रात्री पुरात वाहून गेले आहेत. त्यांचे मृतावशेष मिळाले नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून स्पष्ट करण्यात आले.बदलापूर शहरात सर्वाधिक नुकसानया पूरपरिस्थितीच्या कालावधीत अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहरास सर्वाधिक फटका बसला आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे रहिवाशांना जीवघेण्या समस्येला तोंड द्यावे लागले. याप्रमाणेच उल्हासनगरमधील वालधुनी नदीकाठावरील घरांमध्येदेखील पुराचे पाणी शिरले आहे. तर, कल्याण, भिवंडीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुरबाड, शहापूर तालुक्यांतही नदीकाठालगतच्या भातशेतीचे नुकसान झाले. या पूरस्थितीच्या दोन दिवसांच्या कालावधीत लाखो रुपयांचे नुकसान सद्य:स्थितीत दिसून येत आहे. यांचे नुकसानभरपाईच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे आदेश जारी झाले. त्यानुसार, संध्याकाळपर्यंत दोन हजार ७०० पेक्षा अधिक पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्याचे आढळून आले.अंबरनाथमध्ये शेकडो एकर शेतजमीन पाण्याखालीअंबरनाथ तालुक्यातील रेल्वेच्या काकोळे धरणातील पाणी खालच्या बंधाऱ्यात शिरून ब्रिटिशकालीन भिंतीला भगदाड पडले. यामुळे या परिसरातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. यासारखे शेतीनुकसानीसह घरांच्या पडझडीचे पंचनामे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तहसीलदार यंत्रणेकडून पंचनाम्यास प्रारंभ केला आहे. अंबरनाथ तालुक्यात आतापर्यंत एक हजार ५०० पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित पंचनामे सुरू आहेत. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यात ९७० पंचनाम्यांचे काम झाले. भिवंडीत आतापर्यंत २४५ पंचनामे संध्याकाळपर्यंत झाले. महसूल विभागाकडून युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तालुक्यांमध्ये सुरू आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMumbaiमुंबई