शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे ठाणे जिल्ह्यात झाली लाखोंची हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 02:20 IST

पूरग्रस्तांचे तीन हजार पंचनामे पूर्ण : राबोडीत इमारतीचा

ठळक मुद्देभाग कोसळला, उल्हासनगरला ११० घरांमध्ये पाणी

सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार या पूरपरिस्थितीच्या काळात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून सोमवारपासून करण्यास प्रारंभ केला आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत दोन हजार ७१५ पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील या घरांसह शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तहसीलदारांकडून सुरू आहेत. याप्रमाणेच सोमवारी दुपारीही राबोडीतील इमारतीचा भाग कोसळला, तर उल्हासनगरमध्ये ११० घरांमध्ये पाणी शिरले आहे.

जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचा जोर वाढला होता. यादरम्यान राबोडी येथील पंचगंगा इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या इमारतीत रहिवासी असतानाही हा भाग कोसळला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २० मधील अशोक पाटील कॉलनीत सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे ११० घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे येथील रहिवाशांचे हाल झाले. कल्याण तालुक्यातील रायता गावाजवळील दिनेशकुमार ढेरिया यांच्या डेअरी फार्ममधील १६ गायी, सात वासरे आदी सुमारे २९ जनावरे शुक्रवारच्या रात्री पुरात वाहून गेले आहेत. त्यांचे मृतावशेष मिळाले नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून स्पष्ट करण्यात आले.बदलापूर शहरात सर्वाधिक नुकसानया पूरपरिस्थितीच्या कालावधीत अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहरास सर्वाधिक फटका बसला आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे रहिवाशांना जीवघेण्या समस्येला तोंड द्यावे लागले. याप्रमाणेच उल्हासनगरमधील वालधुनी नदीकाठावरील घरांमध्येदेखील पुराचे पाणी शिरले आहे. तर, कल्याण, भिवंडीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुरबाड, शहापूर तालुक्यांतही नदीकाठालगतच्या भातशेतीचे नुकसान झाले. या पूरस्थितीच्या दोन दिवसांच्या कालावधीत लाखो रुपयांचे नुकसान सद्य:स्थितीत दिसून येत आहे. यांचे नुकसानभरपाईच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे आदेश जारी झाले. त्यानुसार, संध्याकाळपर्यंत दोन हजार ७०० पेक्षा अधिक पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्याचे आढळून आले.अंबरनाथमध्ये शेकडो एकर शेतजमीन पाण्याखालीअंबरनाथ तालुक्यातील रेल्वेच्या काकोळे धरणातील पाणी खालच्या बंधाऱ्यात शिरून ब्रिटिशकालीन भिंतीला भगदाड पडले. यामुळे या परिसरातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. यासारखे शेतीनुकसानीसह घरांच्या पडझडीचे पंचनामे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तहसीलदार यंत्रणेकडून पंचनाम्यास प्रारंभ केला आहे. अंबरनाथ तालुक्यात आतापर्यंत एक हजार ५०० पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित पंचनामे सुरू आहेत. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यात ९७० पंचनाम्यांचे काम झाले. भिवंडीत आतापर्यंत २४५ पंचनामे संध्याकाळपर्यंत झाले. महसूल विभागाकडून युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तालुक्यांमध्ये सुरू आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMumbaiमुंबई