शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

कॉलम खोदतांना ८ गाळे आले खाली, सुदैवाने जिवीतहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 1:56 PM

गाळ्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु असतांना बाजूला असलेले ८ गाळ्यांचे कॉलम खाली सरकल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्दे२२ गाळेधारकांचे झाले होते पुनर्वसनजिवीतहानी नाही

ठाणे - ठाणे महापालिकेने पुनर्वसन केलेल्या गाळ्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी नाल्यावरुन जाण्यासाठी स्लॅब बांधण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरु होते. त्यासाठी कॉलम खोदाईचे काम सुरु असतांनाच बाजूलाच असलेल्या बंद अवस्थेतील ८ गाळ्यांचे कॉलमच खाली सरकल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास वसंत विहार येथे घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.                       ठाणे महापालिकेच्या वतीने रस्त्यात बाधीत झालेल्या गाळेधारकांचे वसंत विहार येथील ग्लॅडी अल्वारीस रोड जवळ पुनर्वसन केले होते. याठिकाणी गाळेधारकांनीच या ठिकाणी २२ गाळ्यांचे बांधकाम सुरु केले होते. हे काम अंतिम टप्यात येऊन तेथे दुकानदारांचे फलकही लावण्यासाठी फ्रेम तयार करण्यात आली होती. दरम्यान या गाळ्यापर्यंत जाण्यासाठी रस्त्याच नसल्याने पालिकेने नाल्यावर स्लॅब टाकून त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता तयार करुन देण्याची हमी दिली होती. त्यानुसार येथे नाल्याच्या ठिकाणी खोदकाम करुन कॉलम टाकण्याचे काम सुरु होते. परंतु त्याचवेळेस २२ पैकी आठ गाळ्यांचे कॉलम खाली सरकल्याची घटना घडली आहे. सुदैवाने हे गाळे सुरु नसल्याने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. परंतु गाळ्यांचे जे काम करण्यात आले होते, ते अतिशय कमकवूत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळेच ही घटना घडली असावी असा कयास पालिकेने लावला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाAccidentअपघात