शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

डॉ. अरु णा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर ठाण्यात  जाहिर व्याख्यान संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 5:02 PM

ठाणे नगर वाचन मंदिर तर्फे शनिवार 9 जून रोजी सायं. 6 वा. ठाणो नगर वाचन मंदिराचे, वा.अ.रेगे सभागृह  येथे डॉ. अरुणा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर जाहिर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

ठळक मुद्देआरोग्यदायी जीवन शैली या विषयावर जाहिर व्याख्यान स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवणे हे आयुर्वेदाचे काम आहे - डॉ. अरुणा टिळक व्यासपीठावर अध्यक्ष पद्माकर शिरवाडकर उपस्थित

ठाणे : ठाणे नगर वाचन मंदिराच्यावतीने डॉ.अरुणा टिळक यांचे ' आरोग्यदायी जीवनशैली ' विषयावर जाहीर व्याख्यान शनिवारी आयोजित केले होते. यावेळी व्यासपीठावर ठाणे नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष पद्माकर शिरवाडकर उपस्थित होते. 

    स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवणे हे आयुर्वेदाचे काम आहे. त्यामुळे आपली जीवनशैली आयुर्वेदानुसार ठेवली तर आपण निरोगी राहू शकतो. मात्र आपल्या चुकीच्या जीवनपध्दती मुळे आपल्याला आजार जडतात. सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी दीड तास आधी उठणे अपेक्षित आहे. त्यानंतर दंतमंजन केल्यास ते दातांच्या तंदुरुस्ती साठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे दातांची निगा चांगली राखली जाते आणि त्याचबरोबर पोटातील अग्नी प्रज्जवलित होण्यास मदत होत असल्याचे नमूद केले. अनेकदा आपल्याला सांगितले जाते सकाळी उठल्यावर 1 लिटर पाणी प्या ,मात्र आयुर्वेदानुसार असे करणे चुकीचे असून अधिक पाणी शरीरासाठी आणि आतड्यांसाठी हानिकारक आहे. पाणी पिणे हे आवश्यक असले तरी बदलत्या ऋतूनुसार पाणी पिण्याच्या सवयी बदलण्याचे आवाहन डॉ. टिळक यांनी केले. आज आपल्या चुकीच्या आहार आणि विहारच्या गोष्टींमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच आपण आजीबाईच्या बटवा आणि त्यातील उपचार पद्धती या विसरून गेली आहोत. त्यामुळे साधं पडसं झाले तरी आपण स्पेशालिस्ट डॉकटरकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले.अनेकदा आपल्याला सांगितले जाते दिवसातून दोन दोन तासाने काहीतरी खा मात्र हे पूर्ण चुकीचे असून तुम्हाला खरंच भूक लागेल तेव्हा खा आणि तहान लागेल तेव्हाच पाणी प्या असा सल्ला डॉ. टिळक यांनी दिला.आपल्याकडे केवळ दिवाळी मध्ये अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे . मात्र तरुणपिढीला ते देखील आवडत नाही असे नमूद करत रोज सर्वांनी अभ्यंगस्नान केले पाहिजे. असे मत डॉ. टिळक यांनी व्यक्त केले. अभ्यंगस्नान केल्यामुळे त्वचा मऊ होऊन तुकतुकीत राहत असल्याचे सांगितले.आजकाल जिम चं फॅड असल्यामुळे त्याकडे अधिक आकर्षण वाढत आहे. मात्र व्यायाम करताना सुर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कार सारखा उत्तम व्यायाम कोणता नाही असे त्यांनी नमूद केले. आज ज्या घरात ज्येष्ठ व्यक्ति आहेत. त्या आपल्याला नेहमी तंदुरुस्त दिसून येतात.कारण पूर्वीच्या काळी लोक दिवसातून फक्त दोनदा जेवत असत. त्यामुळे ते कायम निरोगी राहत असत.अनेकदा लोकांना जेवण झाल्यावर गोड खाण्याची सवय असते मात्र ही सवय आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असून जेवणाची सुरुवात ही नेहमी गोड पदार्थ खाऊन करा असे आवाहन डॉ.टिळक यांनी करत सरतेशेवटी आपण आपली जीवनशैली सुधारली तर आपल्याला कोणताच आजार होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई