शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

जिल्हा इमर्जन्सी कंट्रोल सेंटर मृत्युशय्येवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 3:04 AM

दोन वर्षांपासून या सेंटरची पकड कमी झाल्यामुळे स्फोटांसह कंपन्यांच्या आगीत वाढ झाली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांत स्फोट व आगीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षात सुमारे आठ वर्षांपूर्वी ‘इमर्जन्सी कंट्रोल सेंटर’ सुरू केले. दोन वर्षांपासून या सेंटरची पकड कमी झाल्यामुळे स्फोटांसह कंपन्यांच्या आगीत वाढ झाली आहे. यामुळे औटघटका मोजत असलेले हे इमर्जन्सी सेंटर सक्रिय करण्याची गरज आहे.हे सेंटर ठाणे मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (टीएमए) या संस्थेद्वारे चालवण्यात येत आहे. रासायनिक प्रक्रिया करणाºया कंपन्यांना या कंट्रोल सेंटरचे सभासद करून त्यातील रासायनिक स्फोट व आगप्रतिबंधक उपाययोजनांवर सतत लक्ष केंद्रित करून त्यातील संभाव्य धोके टाळणारे मार्गदर्शन केले जाते. प्रारंभी १३ मोठ्या कंपन्या या कंट्रोल रूमशी संलग्न होत्या. परंतु, त्यांना वेळेत सेवा न मिळाल्याने त्या दुरावल्या. जिल्हाधिकाºयांनी वेळीच लक्ष देऊन हे सेंटर सक्रिय करण्याची गरज आहे. यामुळे कंपन्यांच्या मनमानीला आळा बसून विनापरवाना रासायनिक प्रक्रियांवरही वचक बसेल.आठ महिन्यांत ४८ मृत्यूगेल्या आठ महिन्यांत ८३ दुर्घटनांत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. १५ दिवसांपूर्वी भिवंडी, बदलापूर, नवी मुंबई आदी ठिकाणी कंपन्या, गोडाउनमध्ये आगीच्या घटना घडल्या. भिवंडी तालुक्यातील कशेळी, गुंदवली, दापोडे, दिवे आदी महामार्गांलगतच्या गावांजवळ अनधिकृत १९३ गोडाउनमध्ये रासायनिक विस्फोटकांचा साठा होतो. यातील १८९ गोडाउनकडे परवानगीच नाही.

टॅग्स :Accidentअपघात