शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

जिल्हा वकील संघटनेची सोमवारची निवडणूक रद्द; हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:18 IST

‘वन बार, वन व्होट’नुसार निवडणुकीचा नवा कार्यक्रम लवकरात लवकर जाहीर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई : ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेची (ठाणे डिस्क्ट्रिक्ट कोर्ट्स  बार असोसिएशन) निवडणूक ‘वन बार, वन व्होट’ या तत्त्वानुसार घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून या निवडणुकीचीे सोमवार दि. १० डिसेंबर ही आधी ठरलेली मतदानाची तारीख रद्द केली आहे. ‘वन बार, वन व्होट’नुसार निवडणुकीचा नवा कार्यक्रम लवकरात लवकर जाहीर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.अनेक वकील फक्त ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतात. याखेरीज जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, नवी मुंबई, उल्हासनगर येथील न्यायालयांत वकिली करणारे वकीलही काही प्रकरणे चालविण्यासाठी अधून मधून ठाण्यात येतात. असे वकील दोन्ही ठिकाणच्या वकील संघटनेचे सदस्य असतात. अशा वकिलांना दोन्ही ठिकाणी मतदान करू दिले जाऊ नये यावरून ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेत बरेच दिवस वाद सुरु होता.फक्त ठाण्यात वकिली करणाऱ्या गुलाबराव गावंड व प्रभाकर थोरात या दोन ज्येष्ठ वकिलांनी व जगदीश शिंगाडे आणि नरेंद्र पाटील या दोन तरुण वकिलांनी रिट याचिका करून हा वाद उच्च न्यायालयात नेला. न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर करून निवडणूक ‘वन बार, वन व्होट’ या तत्त्वानुसारच घ्यायला हवी, असा आदेश दिला.ज्या वकील सदस्यांना ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या निवडणुकीत मतदान करायचे असेल त्यांना ‘मी फक्त याच निवडणुकीत मतदान करीन’ असे लिहून द्यावे लागेल. हे स्वयंघोषित बंधन दोन वर्षे लागू राहील व या काळात अशा सदस्याला दुसºया कोणत्याही वकील संघटनेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असेही न्यायालयने स्पष्ट केले.सर्वोच्च न्यायालयाने स्वत:च्याच वकील संघटनेच्या प्रकरणात सन २०११ मध्ये ‘वन बार, वन व्होट’ तत्त्व मंजूर केले. तो निकाल तेवढ्यापुरताच नसून सर्वांनाच बंधनकारक आहे. अ. भा. बार कौन्सिल व महाराष्ट्र बार कौन्सिलनेही ते मान्य करून त्याची अंमलबजावणी करण्याचे ठराव केले आहेत, याची नोंद घेत न्यायालयाने हा आदेश दिला.बार असोसिएशननेही हे तत्त्व मान्य केले. मात्र संघटनेच्या नियमांमध्ये तशी दुरुस्ती केल्यानंतरच ते लागू करावे व तोपर्यंत आताची निवडणूक या तत्त्वाखेरीज घेऊ द्यावी, असे त्यांचे म्हणणे होते. इतरत्र वकिली करणाºयांनी असे करणे ही त्यांच्या व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा आहे.निवडणूक अधिकाºयांच्या परस्पर विरोधी भूमिकांनी गोंधळात गोंधळसंघटनेच्या १२० हून अधिक सदस्यांनी ‘वन बार, वन व्होट’चा आग्रह धरला. तसा ठराव करून ते लागू करण्यासाठी बैठक घेण्यात आली, पण गोंधळामुळे हा निर्णय झाला नाही. आताच्या निवडणुकीसाठी नेमलेल्या श्री. अभ्यंकर व श्री. दुदुसकर या दोन निवडणूक अधिकाºयांनी परस्पर विरोधी भूमिका घेतली.अभ्यंकर ‘वन बार, वन व्होट’च्या बाजूने तर दुदुसकर यांनी विरोधात आदेश काढले. ही गोंधळाची परिस्थिती लक्षात घेऊनच न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली असूनही त्यात हस्तक्षेप केला.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टthaneठाणेElectionनिवडणूक