शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

भिवंडीत स्वछता अभियानाचा बोजवारा; रस्त्यावर पुन्हा कचरा व घाणीचे साम्राज्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 1:57 PM

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष , नागरिकांना नाक मुठीत धरून करावा लागतो प्रवास  

- नितिन पंडीत 

भिवंडी- भिवंडी निजामपूर शहर महानग पालिकेने स्वच्छता अभियानदरम्यान राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा सध्या शहरात फज्जा उडाला असून शहरातील विविध रस्त्यांवर कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याने स्थानिक रहिवासी व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. मात्र या गंभीर बाबडीकडे मनपा प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसल्याने सुज्ञ नागरिकांसह स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

पालिकेच्या विविध प्रभागामध्ये नियमित कचरा उचलण्यास ठेकेदार व पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे . शहरातील अंजूरफाटा येथे रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे . हा कचरा रस्त्याच्या कडेला पसरला असल्याने कचऱ्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी येत असल्याने नागरिकांची रस्त्यावरून प्रवास करताना मोठी गैरसोय होत असून स्थानिकांना नाक मुठीत धरून या ठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे . 

भिवंडी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया हे शहर स्वच्छतेसाठी अतोनात प्रयत्न करत असतांना मनपाचे काही कर्मचारी व अधिकारी मात्र शहराच्या स्वच्छ भारत अभियानालाच तिलांजली देण्याचे काम करत असल्याने शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर अशा प्रकारे कचऱ्याचे मोठं मोठे ढीग साचत आहेत.

विशेष म्हणजे शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सकाळी व रात्री अशा दोन पाळयात कचरा उचलण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याकडे देखील पुरता दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहेत. या दुर्लक्षित कारभारा मुळे शहरात केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे आदेशाचे तीन तेरा वाजले आहेत. या प्रकरणी शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दरमहा कचरा उचलणाऱ्या घंटा गाडी ठेकेदारावर सुमारे ९० लाख रुपये खर्च करीत आहे, असे असताना स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे शहरात अनेक ठिकाणी ठेकेदारा कडुन नियमित कचरा उचला जात नसल्याच्या अनेक ताकजररी नागरिक वेळोवेळी करीत आहेत . तसेच ,औषध फवारणी देखील वेळेवर होत नसल्याने कचऱ्यामुळे नागरिकांना अरोडायच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीthaneठाणे