शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा जनसागर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 21:01 IST

महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ येथील ९५८ वर्षे पुरातन शिवमंदिरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले.

अंबरनाथ  : महाशिवरात्री निमित्त येथील  ९५८ वर्षे पुरातन शिवमंदिरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. नगराध्यक्षा मनिषा वाळेकर आणि सहायक पोलीस आयुक्त सुनिल पाटील यांनी ग्रामस्थ, पुजारी आणि भाविकांचे आभार मानले. यंदा प्रथमच भाविकांना सुरक्षेसाठी शिवमंदिरात खाली गाभाऱ्यात दर्शनासाठी सोडण्यात आले नव्हते. हा बदल भाविकांनी मनापासून स्वीकारत पोलीस व पालिका प्रशासनाला सहकार्य केल्याने महाशिवरात्रीची यात्रा शांततेत व उत्सहात पार पडली. 

महाशिवरात्री निमित्त येथील प्राचीन शिवमंदिरात ठाणे, मुंबई, रायगड, नासिक आदी जिल्ह्यातून अक्षरशः लाखो भाविक दर्शनासाठी नित्य नेमाने येत असतात. काल रात्री साडेबारा पासून दर्शनास प्रारंभ झाला. त्याआधी ग्रामस्थ व पुजारी यांनी दहा ते बारा या दरम्यान अभिषेक व पूजा केली. त्यानंतर दर्शनास प्रारंभ करण्यात आला. भाविकही शांततेने रात्री दहा वाजल्यापासून रांगेत उभे होते. आतापर्यंत भाविकांना मंदिरात शिवलिंगापर्यंत गाभाऱ्यात दर्शनासाठी सोडण्यात येत असे मात्र यंदा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या सभागृहातील पायरी पर्यंतच प्रवेश देण्याची सूचना पोलीस आणि पालिका प्रशासनाने केली होती. या सूचनेला ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांनी तसेच भाविकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.  

सहायक पोलिस आयुक्त सुनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा आणि त्यांची संपूर्ण टीम काल दुपारपासूनच या शिवमंदिर परिसरात तैनात होती. नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, काँग्रेसचे अध्यक्ष तथा गटनेते प्रदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सदाशिव पाटील, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष भरत फुलोरे, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष कुणाल भोईर आदी मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेतला. महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी दर्शनाचा आणि यात्रेचा लाभ घेतला.

यंदा प्रथमच शिवमंदिरात दर्शनाला बंदी घातली मात्र ग्रामस्थ, पुजारी, आणि भाविकांनी सहकार्य केल्या बद्दल नगराध्यक्षा मनिषा वाळेकर व सहायक पोलीस आयुक्त सुनिल पाटील यांनी सर्वांचे खास आभार मानले आहेत. तसेच,  भाविकांचे आणि सर्वांचे सहकार्य लाभल्याने ही यात्रा सुरळीत व शांततेत पार पडली असल्याचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल पाटील यांनी सांगितले. 

कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता सहायक पोलीस आयुक्त सुनिल पाटील आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोळी निरीक्षक मनजितसिंग बग्गा या परिसरात लक्ष ठेवून होते. अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने व टीम तैनात होती. स्वच्छतेबाबत वरचेवर सूचना देण्यात येत होत्या. शहरातील सर्व राजकीय,शैक्षणिक आणि सामाजिक संघटनांनी येणाऱ्या भाविकांच्या सोयी साठी पाणी, फराळ आदींची सोय केली होती.    

टॅग्स :ambernathअंबरनाथMahashivratriमहाशिवरात्री