शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीपाड्यात राहून विकसित केली ‘अ‍ॅण्टी पोल्युशन सिस्टीम’, भारत सरकारने दिले पेटंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 01:46 IST

भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाने या पेटंटला प्रमाणित केले असून त्यांचा हा प्रकल्प भारतासाठीच नव्हे तर जगासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

ठाणे : वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरण आणि भूसृष्टीला मारक ठरू लागला आहे. यामुळे मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. ठाण्यातील आदिवासीपाड्यात राहणाऱ्या एका अभियंत्याने मात्र या प्रदूषणाला आळा घालणारी यंत्रणा विकसित करून ठाण्याचे नाव जागतिक पातळीवर नेण्याचे काम केले आहे. भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाने या पेटंटला प्रमाणित केले असून त्यांचा हा प्रकल्प भारतासाठीच नव्हे तर जगासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.ठाण्यातील घोडबंदर रोड, गायमुख, कशेळी गावात राहणारे महेंद्र लोणारे यांनी 'अ‍ॅण्टी पोल्युशन सिस्टीम आॅन दी रोड' ही यंत्रणा विकसित केली आहे. रस्त्यांवरून धावणाºया गाड्यांमधून जो घातक घटक धुरामधून बाहेर पडतो, त्या धुराला ही यंत्रणा नष्ट करणार आहे. मेकॅनिकल इंजिनीअर असणारे महेंद्र यांचे गेल्या अनेक वर्षांपासून ‘अ‍ॅण्टी पोल्युशन सिस्टीम आॅन दी रोड‘ या प्रकल्पावर संशोधन सुरू होते. जिथे वाहनांची वर्दळ अधिक आहे, अशा ठिकाणी किंवा वाहने धावणाºया रस्त्यांवर ही यंत्रणा बसविल्यास तेथे चालू गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर शोषला जाऊन त्यातील विषारी घटक नष्ट केले जाणार आहेत.९० टक्के कार्बनडायआॅक्साइडहोणार नष्टशहरातील मोठे सिग्नल, चौक किंवा जिथे वाहनांची जास्त वाहतूक आहे, अशा ठिकाणी अथवा रस्त्यांच्या दुभाजकांच्या जागेत हा प्रोजेक्ट राबविता येतो. १०-१२ फूट उंच कारंजासारखे पाण्याचे फवारे उडवून त्याठिकाणी गाड्यांमधून निघणाºया धुरातील विषारी घटक शोषले जाऊन एका टाकीत जमा होणार आहेत. धुरातील वायूचे विषारी कण पाण्यात मिसळून पाणी रिसायकल होणार आहे.हा प्रकल्प ज्या ठिकाणी लावला जाईल, तेथील ९० टक्के कार्बनडायआॅक्साइड आणि इतर विषारी पदार्थ या ठिकाणी नष्ट करता येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकल्पाचे भारत सरकारकडून त्यांना पेटंट मिळाले असून अगदी कमी खर्चात हे प्रकल्प ठिकठिकाणी उभे केले जाऊ शकतात.>गाड्यांमधून निघणारा धूर ही जागतिक समस्या बनली आहे. भारतासारख्या देशाला ही समस्या जास्तच भेडसावणारी आहे. गाड्यांचा वापर अनिवार्य झाला असल्याने त्यांच्यातून निघणाºया विषारी घटकांचा प्रदूषणावर वाईट परिणाम होत आहे. गाड्यांची वाहतूक थांबविता येऊ शकत नाही, पण त्यामधून तयार होणारे प्रदूषण कमी करता येईल का, यावर विचार करत होतो. त्यातूनच ही यंत्रणा उभी केली. अगदी कमी खर्चात ही यंत्रणा उभी करता येऊ शकते. पाण्याच्या कारंजामधून ती कार्यान्वित होत असून, तो परिसरही सुशोभित दिसतो.- महेंद्र लोणारे