शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

विरोध न जुमानता ‘बारवी’ची वाढवणार उंची; एमआयडीसीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 01:52 IST

शहरांची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी एमआयडीसीचे बारवी धरण हे एकमेव उपयुक्त ठरत आहे. पाण्याची गरज लक्षात घेऊन या बारवीची उंची वाढण्यासाठी प्रशासनाने मागील काही वर्षांपासून तयारी दाखवलेली आहे.

सुरेश लोखंडेठाणे : बारवीच्या पात्रातील गावपाड्यांच्या रहिवाशांना न जुमानता यंदाच्या पावसाळ्यात बारवीमध्ये १०० टक्के वाढीव पाण्यासाठी तयार करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी बेहत्तर, परंतु बारवीची उंची वाढवून जादा पाणीसाठा तयार करण्यासाठी एमआयडीसी यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे.

शहरांची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी एमआयडीसीचे बारवी धरण हे एकमेव उपयुक्त ठरत आहे. पाण्याची गरज लक्षात घेऊन या बारवीची उंची वाढण्यासाठी प्रशासनाने मागील काही वर्षांपासून तयारी दाखवलेली आहे. पण, उंची वाढवून पाणीसाठा केल्यास या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आदिवासीपाड्यांना जलसमाधी मिळणार आहे. यामुळे या गावपाड्यांतील ग्रामस्थांनीही धरणाची उंची वाढवण्यास विरोध केला आहे. त्यांचे सुयोग्य पुनर्वसन करण्याची मागणी आहे. त्यांच्या या मागणीस अनुसरून प्रशासनाने पुनर्वसनाचीदेखील तयारी निश्चित केली आहे. पण, ग्रामस्थांचा विरोध कमी होण्यास विलंब झाल्यामुळे बारवीची उंची वाढवण्याचे काम रखडले आहे. पण, शहरांमधील वाढत्या लोकसंख्येस अनुसरून लोकप्रतिनिधींकडून वाढीव पाण्याची मागणी होत आहे. यामुळे यंदा बारवीची उंची वाढवून १०० टक्के पाणीसाठा करण्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एमआयडीसी, लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्यातील महापालिका आयुक्तांमध्ये एकमत झाले. या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहाच्या बैठकीत शुक्रवारी चर्चा होऊन सर्वांनी सहमती दर्शवली. ग्रामस्थांनी विरोध दर्शवला तरी बारवीची उंची वाढवून यंदाच्या पावसाळ्यात १०० टक्के पाणीसाठा करण्यावर एकमत झाले आहे. यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी बेहत्तर. पोलीस त्यांचे काम करतील, पण धरणाची उंची वाढवून यंदा वाढीव पाणीसाठा करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला.

या वाढीव पाणीसाठ्यामुळे धरणाच्या पाणलोटात बाधित गावकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या यादीचीदेखील पालकमंत्र्यांनी विचारणा केली. एक हजार १०० पेक्षा जास्त बाधित गावकºयांची यादी असल्याचे प्रशासनाकडून निदर्शनात आणून देण्यात आले. धरणाच्या पाणलोटातील बाधित लोक आडमुठेपणा करायच्या तयारीत असले, तरी काही एक ऐकून न घेता त्यांचे नियोजित ठिकाणी पुनर्वसन करा. महापालिकांनी ठराव घेतले आहे. आयुक्तांचा होकार, एमआयडीसीची सहमती आहे. आता सर्वांची संमती आणि होकार मिळाल्यामुळे बारवीची उंची वाढवून हा विषय एकदाचा निकाली काढण्यास पालकमंत्र्यांनी प्रशासनास आदेश दिले आहे.

बारवी धरणात उरला ४६ दिवसांपुरताच पाणीसाठा : यंदाच्या पावसाळ्यात पाणीसाठा होऊनही तीन टक्के तूट निर्माण झाली होती. ती भरून काढण्यासाठी आठवड्यातून ३० तासांची पाणीकपात सुरू केली आहे. उत्हासनगर शहरात २४ तासांची म्हणजे महिन्यातून चार दिवस आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी कपात लागू आहे. पावसाळा जवळ आल्यामुळे या कपातीतून सुटका मिळावी, जादा पाणी द्यावे, यासाठी आमदार ज्योती कलानी यांनी मागणी लागू केली. पण, बारवीत केवळ ४६ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. १५ जुलैपर्यंत ते पुरवायचे असल्यामुळे कपात रद्दही होणार नाही आणि वाढीव पाणीही मिळणार नसल्याचे प्रशासनाकडून या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यावर संतापून बारवीची उंची वाढवण्याचा विषय एकदाचा मिटवून टाका आणि यंदा वाढीव पाणीसाठा करण्याचे आदेशच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासनास देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :DamधरणEknath Shindeएकनाथ शिंदेbadlapurबदलापूरkalyanकल्याण