शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

मांगरुळमधील झाडांना आग लावणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची  मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 17:33 IST

मांगरुळ येथे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून लावलेल्या १ लाख रोपांना काही विघ्नसंतोषी लोकांनी लावलेल्या आगी प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे केली.

अंबरनाथ - मांगरुळ येथे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून लावलेल्या १ लाख रोपांना काही विघ्नसंतोषी लोकांनी लावलेल्या आगी प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे केली. आग प्रकरणी झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत दौरा करून दोषींचा तातडीने तपास करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, चैनु जाधव, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. दिघे, विभागप्रमुख अमोल पाटील उपस्थित होते.

जवळपास २० हजार झाडांना याची झळ पोहोचली असली तरीही तात्काळ पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे झाडांना कमी हानी पोहोचली असून त्यांना नवी पालवी फुटत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. किती झाडांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे हे साधारण आठ दिवसात कळेल, त्यानुसार त्या ठिकाणी नवीन रोप लावण्याच्या सूचना त्यांनी वनविभागाला केल्या. भविष्यात अशातर्हेच्या घटना टाळण्यासाठी डोंगराच्या वरच्या भागात चेकपोस्ट निर्माण कारण्यात यावे, असे शिंदे म्हणाले.

ही केवळ एखाद्या खासदार किंवा लोकप्रतिनिधीने लावलेली झाडे नसून २५ हजार लोकांनी एकत्र येऊन लोकसहभागातून केलेली कामगिरी आहे. त्यामुळे अशातर्हेचे प्रकार हे संताजनक असून याप्रकरणी दोषी असलेल्यांचा तातडीने तपास करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून अशा समाजविघातक कामांना आळा बसेल, असे शिंदे म्हणाले. 

मांगरुळ येथील वनविभागाच्या जागेवर ५ जुलै रोजी विविध अध्यात्मिक, सामाजिक संस्था, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक अशा जवळपास २५ हजार नागरिकांनी लोकसहभागातून १ लाख झाडे याठिकाणी लावली होती. या मोहिमेत वन विभाग, कलेक्टर यांनी देखील सहभाग घेतला होता. एकीकडे प्रदूषणाची समस्या गंभीर होत असताना अशातर्हेने वनसंपदा नष्ट करण्याचे होत असलेले प्रकार संतापजनक आहेत मात्र, अशा समाजकंटकांनी कितीही प्रयत्न करोत या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी आम्ही शेवटपर्यंत पार पडणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणेenvironmentवातावरण