शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

coronavirus: साडेतीन हजार कैद्यांची होणार लवकरच सुटका, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 3:43 AM

केंद्र शासनाने ठाणे जिल्ह्याचा रेड झोनमध्ये समावेश केला आहे. सर्व यंत्रणा व जनतेच्या सहकार्याने ही लढाई जिंकायची आहे, असे सांगत गर्दी टाळणे, संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या कारागृहांत सात वर्षे व त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या तब्बल साडेतीन हजार कैद्यांची सुटका केली जाणार आहे. त्यांना त्यांच्या गावी बसगाड्यांत बसवून सोडण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी दिली. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटरच्या माध्यमातून अफवा आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.केंद्र शासनाने ठाणे जिल्ह्याचा रेड झोनमध्ये समावेश केला आहे. सर्व यंत्रणा व जनतेच्या सहकार्याने ही लढाई जिंकायची आहे, असे सांगत गर्दी टाळणे, संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. गरजू व रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.यावेळी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी केलेल्या कामगिरीबद्दल देशमुख यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले. लॉकडाउनच्या काळात सायबर क्राइमचे प्रमाण वाढले आहे. याबाबत कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिसांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या खबरदारीची माहिती दिली. परराज्यांतील मजुरांच्या प्रवासासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.मजुरांसाठी केलेल्या व्यवस्थेबद्दल कौतुकलॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना आणि बंदोबस्त करताना व्यस्त पोलिसांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. परराज्यांतील मजुरांच्या प्रवासासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या काटेकोर नियोजनाचे त्यांनी कौतुक केले.लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या ठिकाणी प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबतही गृहमंत्र्यांनी जिल्हा यंत्रणेचे अभिनंदन केले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कोरोनाची स्थिती, प्रशासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांची यावेळी माहिती दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेAnil Deshmukhअनिल देशमुख