शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात १६१ नागरिक देखरेखीखाली, २२ जणांत कोरोनाची लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 6:40 AM

जिल्हा व महापालिकेच्या आरोग्य यंत्रणांनी परदेशातून प्रवास करून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या १६१ जणांना घरामध्येच वेगळे राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातवर पोहोचली आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने ठोस पावले उचलली आहेत. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची शोधमोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्हा व महापालिकेच्या आरोग्य यंत्रणांनी परदेशातून प्रवास करून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या १६१ जणांना घरामध्येच वेगळे राहण्याच्या सूचना केल्या आहेत.आरोग्य पथके सर्वांच्या घरी जाऊन त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आहेत का, याची पाहणी करीत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २२ जणांमध्ये लक्षणे आढळली असून, या सर्वांना रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात दाखल केले आहे.ठाण्यात कोरोनाचा एक तर नवी मुंबई आणि कल्याणमध्ये प्रत्येकी तीन रु ग्ण आढळले आहेत. परदेशातून प्रवास करून आलेल्या रु ग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली असून, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अशा प्रवाशांसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात परदेशातून आलेल्या, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या १६१ जणांना घरात राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. त्यापैकी २२ जणांचा १४ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत २२ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली असून, त्यांना उपचारासाठी मुंबईतील रु ग्णालयात दाखल केले आहे. आरोग्य यंत्रणेने गर्दीच्या ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, शहरात फलकांद्वारे जनजागृती केली जात आहे.कोणत्या देशातून किती आले?चीन १६, अमेरिका - ०५, फ्रान्स -०३, दुबई -४२, इराण -२१, सिंगापूर -०४, इटली - ०५, थायलंड - ०३, जपान - ०३, भुतान ०४, मस्कत - ०२, पुणे - ०३, सौदी - ०९, जर्मनी -०५, बहरीन - ०१, कोरीया - ०२, इंडोनेशिया - ०१, युके - ०६, कतार - ०१, मॉरीशस - ०१, गोरखपूर -०४, तुर्की - १, आर्यलन्ड - ०१, युएई - ०३, केरळ - ०१, रोमानीया - ०१, इतर -१३, एकूण - १६१महापालिका हद्दीत आणखी १९ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी नऊ जणांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे. दहा जणांचा अहवाल येणे बाकी आहे. मागील दहा दिवसांत शहरात टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून परदेशातून आलेल्या १११ नागरिकांना त्यांच्याच घरात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ज्या तीन महिला कोरोनाबाधित टॅक्सीचालकाच्या संपर्कात आल्या होत्या, त्यांचे रिपोर्टही निगेटिव्ह आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. ज्यांना सर्दी, खोकला असेल त्यांनीच मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिरुद्ध माळगावकर यांनी केले आहे.विलगीकरण केंद्रात तीन रुग्ण वाढलेपनवेल : पनवेल महानगरपालिकेने ग्रामविकास भवनात स्थापन केलेल्या विलगीकरण केंद्रात दाखल केलेल्या नागरिकांचा आकडा वाढला आहे. नव्याने परदेशातून आलेल्या तीन नागरिकांना या विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्रातील नागरिकांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.रविवारी सायंकाळी ३५ नागरिकांना या विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले होते. यापैकी बहुतांशी नागरिक दुबईवरून परतले आहेत. दुबईमार्गे भारतात दाखल झालेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाल्याने दुबईसह परदेशातून येणाºया नागरिकांना तत्काळ विलगीकरण केंद्रात ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.सोमवारी या विलगीकरण केंद्रात दाखल केलेल्या नागरिकांना योग्य सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप केला होता. मात्र पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी याची गंभीर दखल घेत सर्व सोयी-सुविधा नागरिकांना पुरविण्याचे आदेश सोमवारी पालिका प्रशासनाला दिले. या विलगीकरण केंद्रातील नागरिकांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळली नसली तरी एकूण १४ दिवस सर्वांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. या नागरिकांची नियमित तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, पनवेल परिसरातील आणखी नागरिक परदेशात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विलगीकरण केंद्रातील नागरिकांची संख्या पुढील दिवसात वाढणार आहे.कामोठेत अफवांना पेवकामोठे शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यापासून पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अफवांना पेव फुटले आहे. कामोठे येथील ६२ वर्षीय रुग्णाला मुंबईमधील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त एकही रुग्ण पनवेल महानगरपालिक ा क्षेत्रात नाही. त्यामुळे शहरवासीयांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेpanvelपनवेल