शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

coronavirus: मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या साडे 10 हजार पार ; 358 जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 11:22 PM

मीरा भाईंदर मध्ये कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे . त्याच बरोबर रोज दिडशे ते दोनशे च्या संख्येत नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत .

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांनी 10 हजारांचा आकडा ओलांडला असून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या हि 10 हजार 560 इतकी झाली आहे . तर आता पर्यंत शहरात कोरोना मुळे 358 जणांचा मृत्यू झाला आहे . एकीकडे कोरोना रोखण्यासाठीच्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने कोरोनाचे रुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात महापालिका आणि लोकप्रतिनिधी यांना अपयश आले आहे . आज शनिवारी आता पर्यंतचे सर्वात जास्त 11 कोरोना रुग्णांचे मृत्यू दिवसभरात झाले आहेत .मीरा भाईंदर मध्ये कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे . त्याच बरोबर रोज दिडशे ते दोनशे च्या संख्येत नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत . महापालिकेचे जोशी रुग्णालय व कोविड केअर मध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केले जात असून डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी एकीकडे उपचाराचे काम करत असताना दुसरीकडे अनेक राजकारणी , नगरसेवक व महापालिका प्रशासन मात्र आपापल्या भागातील कोरोना निर्देशांच्या उल्लंघना कडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत .जेणे करून शहरात सर्रास मास्क न घालता फिरणारे , गर्दी करणारे व बेकायदा विक्रेते मोकाट झाले असून त्यांना जबाबदारी आणि कारवाईचा कोणताच धाक उरलेला नाही . परंतु राजकारण्यांना मात्र राजकीय चमकोगिरी करण्यातच स्वारस्य असल्याचे पदोपदी दिसून येत आहे . यातूनच शहरात कोरोना रोखण्यासाठीच्या निर्देशांचे पालनच केले जात नसल्याने कोरोना संसर्ग कमी करण्यात अपयश आलेले आहे असे जाणकारांनी स्पष्ट केले .शहरातील शनिवार रात्रीच्या महापालिकेच्या आकडेवारी नुसार कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 560 इतकी झाली आहे . यातील 8 हजार 647 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत . तर 358 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे . आत पर्यंत 35 हजार 107 लोकांचे स्वाब नमुने घेण्यात आले होते . त्यातील 24 हजार 379 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . 21 हजार 466 जणांना महापालिकेने स्वतःच्या देखरेखी खाली ठेवले आहे .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMira Bhayanderमीरा-भाईंदर