शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

Corona Vaccine : कोरोना लसीचा साठा नसल्याने मीरा भाईंदर पालिकेची ६ लसीकरण केंद्र बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 8:58 PM

Corona Vaccine And Mira Bhayander Municipal Corporation : लोकांनी लसीकरण केंद्रावर नोंदणी शिवाय गर्दी करू नये असे आवाहन पालिकेने केले आहे. 

मीरारोड - केंद्र शासनाकडून कोरोनाच्या मागणीनुसार लस दिल्या जात नसल्याचा आरोप होत असतानाच मीरा भाईंदर महापालिकेत सुद्धा केवळ ३३४० इतक्याच शिल्लक असल्याने महापालिकेने ६ लसीकरण केंद्र बंद केली आहेत. तर उर्वरीत ५ लसीकरण केंद्रावर सुद्धा केवळ लसीचा दुसरा डोस घ्यायचे बाकी असणाऱ्यांनाच लस दिली जाणार आहे. रोज केवळ ५०० लोकांनाच लस मिळणार आहे. लोकांनी लसीकरण केंद्रावर नोंदणी शिवाय गर्दी करू नये असे आवाहन पालिकेने केले आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेला शासनाकडून कोविशील्डच्या ९४ हजार तर कोवॅक्सीनच्या १२ हजार ६२० अशा एकूण १ लाख ६ हजार ६२० लसींचा साठा पुरवण्यात आला होता. शहरात लसीकरणासाठी पालिकेची ११ केंद्र तर खासगी ९ केंद्र सुरू करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांचे लवकर लसीकरण व्हावे या अनुषंगाने  रोज ३ ते साडे तीन हजार लसीकरणाचे टार्गेट असताना सुमारे ५ हजार पर्यंत रोज लसीकरण केले गेले केले. लसीकरण केंद्रावर वैद्यकीय कमर्चाऱ्यांसह शिक्षक, आशा वर्कर यांची सुद्धा मदत घेण्यात आली. महापालिकेने लसीकरणाचे नियोजन करत जास्तीजास्त सुविधा देत त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला.

बुधवार ७ एप्रिल पर्यंतच्या आकडेवारीनुसार पहिला डोस दिलेल्यांची संख्या ८६ हजार ९२७ तर दुसरा डोस दिलेल्यांची संख्या ८ हजार ८९ इतकी होती. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ४३ हजार २२८ लस देण्यात आल्या. तर ४५ ते ६० वयोगटातील ३१ हजार ५११ जणांना लस देण्यात आली. वैद्यकीय व आपत्कालीन सेवेतील लोकांना १३ हजार ३३१ आणि ६ हजार ९४६ इतक्या लस देण्यात आल्या आहेत. परंतु लसीची सतत मागणी करून देखील पुवठा न झाल्याने गुरुवार ८ एप्रिलच्या सायंकाळी केवळ ३३४० कोविशील्डच्या लस शिल्लक राहिल्या आहेत . लसीचा साठा जवळपास संपल्याने महापालिकेला आता लसीकरणाची मीरारोड, विनायक नगर, मुर्धा, पेणकर पाडा, नवघर व उत्तन येथील आरोग्य केंद्रातील लसीकरण तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, मीनाताई ठाकरे सभागृह, बंदरवाडी आरोग्य केंद्र व काशीगाव आरोग्य केंद्रातच लसीकरण चालणार आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा नव्याने लसीकरण केले जाणार नाही. केवळ दुसरा डोस ज्यांचा बाकी आहे त्यांचेच लसीकरण केले जाणार आहे. लसीची उपलब्धता पाहता रोज प्रत्येक लसीकरण केंद्रात केवळ १०० लोकांनाच लस दिली जाणार असून एकूण ५०० लस रोज दिल्या जातील. लसीचा पुरवठा होताच पुन्हा लसीकरण सुरू केले जाणार आहे. 

डॉ . अंजली पाटील (लसीकरण अधिकारी , महापालिका) - सध्या शासनाकडून लसीचा पुरवठा झालेला नसल्याने ६ केंद्र तात्पुरती बंद केली आहेत. ज्या ५ केंद्रात लसीकरण सुरू आहे तेथे रोज प्रत्येकी १०० जणांनाच तेही दुसरा डोस बाकी असणाऱ्यांना लस दिली जाईल.   नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये व ऑनलाईन नोंदणी करावी. लसीचा पुरवठा होताच पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल. नागरिकांना कोरोना संसर्गाचा पासून मुक्त करण्यासाठी पालिकेने दिलेल्या इष्टांक पेक्षा जास्त वेगाने लसीकरण केले आहे. लसीकरण केंद्रात आवश्यक सर्व सुविधा व कर्मचारी तैनात आहेत.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक