शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

Coronavirus: परराज्यांतून परतणाऱ्यांच्या नोंदणीकडे दुर्लक्ष; मराठी एकीकरण समितीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 2:10 AM

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने शहरातील कामगार तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यातील आपल्या मूळ गावी परतले.

मीरा रोड : कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन झाल्यावर गावाला गेलेले कामगार पुन्हा परतू लागले आहेत. परंतु परराज्यातून परतलेल्यांची नोंदणी केली जात नसून कोरोनाच्या अनुषंगानेही त्यांची नोंद होत नसल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केला आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने शहरातील कामगार तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यातील आपल्या मूळ गावी परतले. सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये परतणाऱ्यांची होती. परंतु परराज्यातील मूळगावी महाराष्ट्राच्या तुलनेत हाताला काम व उत्पन्न नसल्याने कामगार व कुटुंब पुन्हा परतू लागले आहेत. मीरा- भार्इंदरमधील लहान- मोठे उद्योग पुन्हा सुरू होऊ लागले असून अन्य लहान व्यवसाय सुरु होत आहेत. मूळ गावी परत जाण्यासाठी राज्य सरकारने कामगारांची रेल्वे व बसने मोफत प्रवासाची सोय केली होती. शिवाय असंख्य जण पायी वा टेम्पोमधून जात होते. पण आता अनेकजण पुन्हा मिळेल त्या मार्गाने रोजगारासाठी शहरात येत असताना त्यांची कोणतीच नोंदणी केली जात नाही. अशा लोकांना अलगीकरणात ठेवले जात नाही. कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेतली जात नाही असे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले. परराज्यातून पोटापाण्यासाठी येणाºया लोकांची नोंदणी करणे कायद्याने आवश्यक आहे. गृहमंत्र्यांनीही बाहेरून येणाºया कामगारांची नोंदणी केली जाईल म्हटले होते. परंतु पोलीस व पालिका नोंदणी करत नसल्याने पुन्हा बजबजपुरी माजेल. स्थानिकांना रोजगार मिळणार नाही अशी भीतीही व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरण