शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus:...तर संतप्त जनता रस्त्यावर उतरल्यास लॉकडाऊनला काहीच अर्थ राहणार नाही; मनसेचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 08:32 IST

दिवा विभागात २४ तास वीज खंडित होत असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत.

ठाणे – राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या कालावधीत लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कल्याण ग्रामीण मतदारसंघातील दिवा येथे वीज पुरवठा खंडित असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात आमदार राजू पाटील यांनी लिहिलंय की, राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. दिवा विभागातही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच राज्यात लॉकडाऊन असल्याने सर्व लोक घरी थांबले आहेत. अशा स्थितीत अत्यावश्यक सेवा असलेला वीज पुरवठा सुरळीत असावा अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु टोरंट कंपनीचा भोंगळ कारभार सुरु असून वीज पुरवठ्यामध्ये बिघाड होऊन १२-१२ तास झाले तरीही कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक बिघाड सापडत नाही हे दुर्दैवी आहे असं त्यांनी सांगितले आहे.

दिवा विभागात २४ तास वीज खंडित होत असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. वास्तविक या कंपनीला दिवावासियांनी विरोध केला होता. तरीही शासनाने जबरदस्तीने ही कंपनी लादली आहे त्याचे परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. टोरंटपेक्षा महावितरणचा कारभार चांगला होता अशी भावना जनतेमध्ये आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार वीज खंडित होत असल्याने त्रस्त जनतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्यास लॉकडाऊनचा काहीही उपयोग होणार नाही अशी भीती मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे या प्रकरणात तातडीने लक्ष घालून दिवा-शीळ विभागातील टोरंट कंपनीच्या हातातील कारभार तात्काळ काढून महावितरणकडे घेण्यात यावा. सतत होणाऱ्या वीजेच्या खेळ-खंडोबामुळे रहिवासी रस्त्यावर उतरल्यास लॉकडाऊनला कोणताही अर्थ उरणार नाही व याची सर्वस्वी जबाबदारी ऊर्जा विभाग आणि टोरंट कंपनीच्या प्रशासनावरच राहील याची दखल घ्यावी असा इशाराही मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रातून दिला आहे.

टॅग्स :MNSमनसेNitin Rautनितीन राऊतelectricityवीजcorona virusकोरोना वायरस बातम्या