शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

coronavirus: 18 दिवसांच्या लॉकडाऊन काळात मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचाचण्या आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 15:04 IST

मीरा भाईंदर मध्ये मार्च अखेरीस पासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली . 18 जुलै पर्यंत  पालिकेने 19 हजार 201 इतक्या कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. या तील जवळपास निम्म्या 8 हजार 878 कोरोना चाचण्या ह्या महापालिकेने अवघ्या 1 ते 18 जुलै या 18 दिवसांच्या कालावधीत केल्या आहेत . 

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये 30 जून पर्यंतच्या मागील 3 महिन्यात कोरोना चाचण्यांची संख्या 10 हजार 423 आणि कोरोना रुग्णांची बरे होण्याची संख्या 2364 इतकी होती . परंतु लॉकडाउनच्या जुलैच्या अवघ्या 18 दिवसांच्या कालावधीत तब्बल 8 हजार 878 चाचण्या करण्यात येऊन 2 हजार 555 रुग्णांना बरे करून घरी सोडले आहे . कोरोना चाचणी व रुग्ण बरे होण्याचे 18 दिवसातील प्रमाण हे विक्रमी असून दिलासादायक आहे . पण त्याच बरोबर या 18 दिवसात 3096 नवे कोरोना रुग्ण शोधून काढण्यात आले व 74 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे . 

मीरा भाईंदर मध्ये मार्च अखेरीस पासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली . 18 जुलै पर्यंत  पालिकेने 19 हजार 201 इतक्या कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. या तील जवळपास निम्म्या 8 हजार 878 कोरोना चाचण्या ह्या महापालिकेने अवघ्या 1 ते 18 जुलै या 18 दिवसांच्या कालावधीत केल्या आहेत . 

18 जुलै पर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 422 तर यातून बरे झालेल्यांची संख्या 4 हजार 919 इतकी आहे . कोरोनाने आता पर्यंत शहरात 219 लोकांचा बळी घेतला आहे . नव्याने नियुक्त केलेले आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी आल्या पासून सर्वेक्षण , कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासह रुग्णांच्या उपचारावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे आकडेवारी वरून दिसून आले आहे . 

जून अखेरच्या गेल्या तीन महिन्यात कोरोना तुन बरे होणारे 2364 रुग्ण होते . परंतु जुलैच्या 18 दिवसात तब्बल 2 हजार 555 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत . यावरून पालिकेच्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक देखील केले जात आहे . कारण रुग्ण बरे होण्याची हि अवघ्या 18 दिवसातील संख्या विक्रमी अशीच आहे . 

परंतु कोरोना मुळे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे . 3 महिन्यात 145 रुग्णांचे मृत्यू झाले होते तर गेल्या 18 दिवसात तब्बल 74 लोकांचा बळी गेला आहे . कोरोनाच्या रुग्णांची संख्या देखील गेल्या 18 दिवसात दुप्पट झाली आहे . मागील 3 महिन्यात कोरोनाचे 3 हजार 326 इतके रुग्ण होते. परंतु गेल्या 18 दिवसातच तब्बल 3 हजार 96 रुग्ण सापडले आहेत . चाचण्या वाढल्या आणि चेस द व्हायरस हि मुंबईच्या धर्तीवर राबवलेल्या मोहिमे मुळे रुग्णांची संख्या वाढल्याचे पालिकेच्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले .

 कोरोनाचा विषाणू व संसर्ग रोखायचा असेल तर मास्क घालणे , गर्दी टाळून अंतर ठेवणे आणि नाका तोंडाला हात स्वच्छ केल्या शिवाय लावू नये आदी निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने केले पाहिजे . तसेच कोरोना झालेली व त्याच्या संपर्कातील शेवटची व्यक्ती शोधून काढणे व अलगीकरण करून उपचार करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले . 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक