शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

coronavirus: सात महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष; विद्या प्रसारक मंडळाची उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 05:11 IST

ठाणे महानगरपालिकेने नोटीस न देताच सात महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेतल्याने कोंडीत अडकलेल्या ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने ठाणे पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : एकीकडे मुंबई विद्यापीठाने एफवाय व एसवायच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून निकाल लावण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेने नोटीस न देताच सात महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेतल्याने कोंडीत अडकलेल्या ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने ठाणे पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.मुंबई विद्यापीठाने २५ मे २०२० रोजी परिपत्रक काढून सर्व महाविद्यालयांना पेपर तपासून निकाल लावण्याचे आदेश दिले. राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्व खबरदारीचे उपाय आखून पेपर तपासण्याची प्रक्रिया सुरू असताना ठाणे पालिकेने कोणतीही नोटीस न देता ८ जून रोजी विद्या प्रसारक मंडळाचे के. जी. जोशी महाविद्यालय, एन. जी. बेडेकर, बी. एन. बांदोडकर, टीएमसी विधि महाविद्यालय, पॉलिटेक्निक आणि डॉ. व्ही. एन. बेडेकर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज् आणि कॅन्टीनची इमारत विलगीकरण केंद्र असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ९ जून रोजी ठाणे पालिकेचे १०-१५ अधिकारी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन महाविद्यालयाच्या आवारात धडकले. सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांचा निकालाचा प्रश्न असल्याने ठाणे पालिकेचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय बेडेकर यांनी अ‍ॅड. नितीन प्रधान यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पूर्व नोटीस न देता पोलिसांच्या उपस्थितीत सात महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेण्याचा पालिकेचा निर्णय बेकायदेशीर ठरवावा आणि रद्दबातल करावा, अशी विनंती याचिकादारांनी केली आहे.‘पेपर तपासण्याचे काम सुरू असताना संबंधित महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेऊन त्यांचे विलगीकरण कक्षात रूपांतर करणे योग्य आहे का? याचिकाकर्ते चालवत असलेली महाविद्यालये लॉकडाऊनमुळे तात्पुरती बंद आहेत. त्यांना कायमचे टाळे लावण्यात आले नाही. लॉकडाऊन काढल्यावर लगेच महाविद्यालये सुरू करण्यात येतील,’ असे याचिकेत म्हटले आहे.मार्गदर्शक तत्त्वांचा पडला विसरमहाराष्ट्र कोविड - १९ अधिनियम, २०२० नुसार, राज्य सरकारने विलगीकरण केंद्रासाठी सरकारी किंवा खासगी इमारत ताब्यात घेण्याची परवानगी दिली आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विलगीकरण केंद्रे गजबजलेल्या ठिकाणी नसावीत. शहराच्या किंवा गावाबाहेर असावीत. मात्र, या सातही महाविद्यालयांच्या इमारती गजबजलेल्या ठिकाणी आहेत. आजूबाजूला रहिवासी इमारती असून नागरिकांचा जीव धोक्यात घालण्यात येत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेEducation Sectorशिक्षण क्षेत्रMumbai High Courtमुंबई हायकोर्ट