शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

coronavirus: परीक्षा रद्दबाबत मतमतांतरे, शैक्षणिक नुकसान होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:51 IST

शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य यांनीदेखील परीक्षा घेण्यात याव्या, असे मत व्यक्त केले आहे. कोरोनामुळे परीक्षा घ्याव्यात की रद्द कराव्या, या संदर्भात गोंधळ सुरू आहे. परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

ठाणे : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ठाण्यातील काही विद्यार्थ्यांनी पाठिंबा तर काहींनी विरोध दर्शविला आहे. आधीच्या परीक्षांचे गुण विचारात घेऊन अंतिम परीक्षेचे गुण देण्यात यावे, असे काही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे तर काहींनी मात्र परीक्षा या घेतल्याच पाहिजेत अन्यथा ज्यांनी अभ्यासच केला नाही, असे विद्यार्थी पास होतील आणि त्याचा परिणाम इतर विद्यार्थ्यांवर होईल, असे काही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य यांनीदेखील परीक्षा घेण्यात याव्या, असे मत व्यक्त केले आहे. कोरोनामुळे परीक्षा घ्याव्यात की रद्द कराव्या, या संदर्भात गोंधळ सुरू आहे. परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये यावर मतभिन्नता दिसली. परीक्षेचे स्वरूप बदला पण परीक्षा घ्याच, असे काही विद्यार्थी म्हणत आहेत तर काहींनी आता अभ्यास विसरायला झाला आहे. संसर्ग होऊ नये म्हणून इतके दिवस घरात बसलो. परीक्षेला गेलो आणि संसर्ग झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न काही विद्यार्थी विचारत आहेत.परीक्षा झाल्याच पाहिजेत. कारण विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केले तर पुढे जेव्हा ते उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी ते जातील तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नक्की वेगळा असेल. हे विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झालेले आहेत असा शिक्का आमच्यावर लागेल. - योगिता मिठारे, केबीपी महाविद्यालयठाण्यात रुग्ण वाढत आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे आधीचे गुण पाहून अंतिम परीक्षेचे गुण द्यावेत. - आरती गांगुर्डे,ज्ञानसाधना महाविद्यालयपरीक्षा रद्द व्हावी कारण सध्या आरोग्य महत्त्वाचे आहे. एखाद्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असतील आणि तेथील विद्यार्थी परीक्षेला आला तर संसर्ग होणार नाही का? त्यामुळे राज्य सरकारची भूमिका योग्य आहे.- करण कांबळे, जोशी-बेडेकर महाविद्यालयअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा उशिरा का होईना पण त्या झाल्या पाहिजेत. भविष्यात या मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक अहवाल (ट्रान्स्क्रिप्ट) चा फायदा होईल. वाणिज्य, कला, विज्ञान या शाखांचे विद्यार्थी वेगवेगळ्या वेळी बोलवून परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. फार तर कालावधी वाढेल पण विद्यार्थ्यांचे भविष्यातील नुकसानही टळेल. कोरोनामुळे शैक्षणिक नुकसान झाले आहे. मग परीक्षा रद्द करून त्यांचे आणखीन नुकसान का करावे.- डॉ. चंद्रशेखर मराठे, प्राचार्य, ज्ञानसाधना महाविद्यालयपरीक्षा घेणार असतील तर पुरेशी दक्षता घेतली पाहिजे. अन्यथा रद्द करावी. आम्हाला गुण देण्यात अडसर येत असेल तर ‘वर्क फ्रॉम होम’ प्रमाणे ‘एक्झामफ्रॉम होम’ घेऊन गुण देण्यात यावे.- तन्वी ठोसर, ज्ञानसाधना महाविद्यालयएखादा मध्यममार्ग काढून परीक्षा व्हायला हवी. परीक्षा रद्द झाली तर वर्षभर केलेला अभ्यास वाया जाईल. उलट जे अभ्यास करत नव्हते ते पास होतील.- श्रुती पांजरी, ज्ञानसाधना महाविद्यालयकोरोनावर अद्याप लस आलेली नाही. कोरोनाचा प्रसार कसाही होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा रद्दच व्हावी. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार होईल.- साहिल वारेकर, जोशी-बेडेकर महाविद्यालयपरीक्षा या व्हायलाच हव्यात. त्या कशा पद्धतीने घ्याव्यात हे विद्यापीठाने ठरवावे. अंतिम वर्षाची परीक्षा दिल्यावर काही विद्यार्थी नोकरी करतात तर काही परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. त्यामुळे ते काय शिकले याचे मूल्यमापन होत असते. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने परीक्षा घेणे महत्त्वाचे आहे.- डॉ. विजय बेडेकर, शिक्षण संस्थाचालक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार