शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
2
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
4
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
5
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
6
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
7
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
8
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
9
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
10
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
11
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
12
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
13
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
14
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
15
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
16
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
17
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
18
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
20
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: परीक्षा रद्दबाबत मतमतांतरे, शैक्षणिक नुकसान होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:51 IST

शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य यांनीदेखील परीक्षा घेण्यात याव्या, असे मत व्यक्त केले आहे. कोरोनामुळे परीक्षा घ्याव्यात की रद्द कराव्या, या संदर्भात गोंधळ सुरू आहे. परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

ठाणे : विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ठाण्यातील काही विद्यार्थ्यांनी पाठिंबा तर काहींनी विरोध दर्शविला आहे. आधीच्या परीक्षांचे गुण विचारात घेऊन अंतिम परीक्षेचे गुण देण्यात यावे, असे काही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे तर काहींनी मात्र परीक्षा या घेतल्याच पाहिजेत अन्यथा ज्यांनी अभ्यासच केला नाही, असे विद्यार्थी पास होतील आणि त्याचा परिणाम इतर विद्यार्थ्यांवर होईल, असे काही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य यांनीदेखील परीक्षा घेण्यात याव्या, असे मत व्यक्त केले आहे. कोरोनामुळे परीक्षा घ्याव्यात की रद्द कराव्या, या संदर्भात गोंधळ सुरू आहे. परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये यावर मतभिन्नता दिसली. परीक्षेचे स्वरूप बदला पण परीक्षा घ्याच, असे काही विद्यार्थी म्हणत आहेत तर काहींनी आता अभ्यास विसरायला झाला आहे. संसर्ग होऊ नये म्हणून इतके दिवस घरात बसलो. परीक्षेला गेलो आणि संसर्ग झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न काही विद्यार्थी विचारत आहेत.परीक्षा झाल्याच पाहिजेत. कारण विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केले तर पुढे जेव्हा ते उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी ते जातील तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नक्की वेगळा असेल. हे विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झालेले आहेत असा शिक्का आमच्यावर लागेल. - योगिता मिठारे, केबीपी महाविद्यालयठाण्यात रुग्ण वाढत आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे आधीचे गुण पाहून अंतिम परीक्षेचे गुण द्यावेत. - आरती गांगुर्डे,ज्ञानसाधना महाविद्यालयपरीक्षा रद्द व्हावी कारण सध्या आरोग्य महत्त्वाचे आहे. एखाद्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असतील आणि तेथील विद्यार्थी परीक्षेला आला तर संसर्ग होणार नाही का? त्यामुळे राज्य सरकारची भूमिका योग्य आहे.- करण कांबळे, जोशी-बेडेकर महाविद्यालयअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा उशिरा का होईना पण त्या झाल्या पाहिजेत. भविष्यात या मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक अहवाल (ट्रान्स्क्रिप्ट) चा फायदा होईल. वाणिज्य, कला, विज्ञान या शाखांचे विद्यार्थी वेगवेगळ्या वेळी बोलवून परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. फार तर कालावधी वाढेल पण विद्यार्थ्यांचे भविष्यातील नुकसानही टळेल. कोरोनामुळे शैक्षणिक नुकसान झाले आहे. मग परीक्षा रद्द करून त्यांचे आणखीन नुकसान का करावे.- डॉ. चंद्रशेखर मराठे, प्राचार्य, ज्ञानसाधना महाविद्यालयपरीक्षा घेणार असतील तर पुरेशी दक्षता घेतली पाहिजे. अन्यथा रद्द करावी. आम्हाला गुण देण्यात अडसर येत असेल तर ‘वर्क फ्रॉम होम’ प्रमाणे ‘एक्झामफ्रॉम होम’ घेऊन गुण देण्यात यावे.- तन्वी ठोसर, ज्ञानसाधना महाविद्यालयएखादा मध्यममार्ग काढून परीक्षा व्हायला हवी. परीक्षा रद्द झाली तर वर्षभर केलेला अभ्यास वाया जाईल. उलट जे अभ्यास करत नव्हते ते पास होतील.- श्रुती पांजरी, ज्ञानसाधना महाविद्यालयकोरोनावर अद्याप लस आलेली नाही. कोरोनाचा प्रसार कसाही होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा रद्दच व्हावी. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार होईल.- साहिल वारेकर, जोशी-बेडेकर महाविद्यालयपरीक्षा या व्हायलाच हव्यात. त्या कशा पद्धतीने घ्याव्यात हे विद्यापीठाने ठरवावे. अंतिम वर्षाची परीक्षा दिल्यावर काही विद्यार्थी नोकरी करतात तर काही परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. त्यामुळे ते काय शिकले याचे मूल्यमापन होत असते. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने परीक्षा घेणे महत्त्वाचे आहे.- डॉ. विजय बेडेकर, शिक्षण संस्थाचालक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार