शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Coronavirus : कच्चा माल येणे बंद, अंबरनाथ एमआयडीसीमधील रासायनिक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 2:13 AM

अंबरनाथ एमआयडीसी भागात तब्बल हजाराहून अधिक कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने हे रासायनिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल हा चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो.

अंबरनाथ : अंबरनाथमधील औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने कच्च्या मालाअभावी बंद करण्याची वेळ आली आहे. तीन महिन्यांपासून कच्चा माल भारतात येत नसल्याने हे कारखाने बंद करावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा रासायनिक कारखान्यांना बसत आहे.अंबरनाथ एमआयडीसी भागात तब्बल हजाराहून अधिक कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखाने हे रासायनिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना आवश्यक असलेला कच्चा माल हा चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो. मात्र, तीन महिन्यांपासून कच्चा माल भारतात येत नसल्याने या कंपन्यांना प्रक्रिया करण्यासाठी साधनसामग्री कमी पडत आहे. त्यातच कच्चा माल येत नसल्याने हे कारखाने बंद करण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती इतर कारखान्यांच्या बाबतीतही घडत आहे. एमआयडीसी भागातील अनेक कारखाने हे परदेशातून येणाºया कच्च्या मालावर अवलंबून आहेत.मात्र, कोरोनाच्या धोक्यामुळे सर्व व्यापार ठप्प झाल्याने त्याचा फटका औद्योगिक वसाहतीला बसला आहे. कंपनीमध्ये काम करण्यासाठी साधन नसल्याने कामगारांवर बसून राहण्याची वेळ येत आहे. तसेच तयार झालेला मालही परदेशात जात नसल्याने मोठ्या प्रमाणात तयार माल पडून आहे. गेल्या महिनाभरापासून औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनही मंदावले आहे. आता अनेक कारखान्यांना आपल्या कामगारांना सक्तीची सुटी देण्याची वेळ आली आहे.अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनीही या परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे. अंबरनाथमधील अनेक कारखानदारांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम केवळ उत्पादनावरच नव्हे तर कामगारांच्या रोजगारावरही पडणार आहे.रिक्षा राहणार बंदअंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकाने, रिक्षा उद्यापासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी पालिकेच्या सभागृहात बैठक झाली त्यात हा निर्णय झाला. रिक्षामधून संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत पूर्व भागात पाच आणि पश्चिम भागात पाच रिक्षा सुरु ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथMIDCएमआयडीसी