शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

CoronaVirus News: "आयुक्तांची बदली करण्याऐवजी दोन्ही मंत्र्यांना पदांवरून दूर करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 15:44 IST

भाजप आणि मनसे झाली आक्रमक; अपयश झाकण्यासाठी आयुक्तांची बदली केल्या आरोप

ठाणे  : ठाणे  महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांच्या बदलीवरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोरोनाचे अपयश झाकण्यासाठीच आयुक्तांची बदली करण्यात आल्याचा आरोप आता भाजप आणि मनसेने केले आहे. वास्तविक पाहता हे नगरविकास विभागाचे अपयश असून त्यांनी ही जबाबदारी स्विकारणे  अपेक्षित आहे. तसेच ठाण्यातील दोनही मंत्र्यांचे हे अपयश असून त्यांचे मंत्रीपद काढावे असा सुर आता या दोनही पक्षांनी लावला आहे.ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर महापालिका भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यानुसार उल्हासनगर आणि मिराभाईंदर महापालिकेच्या आयुक्तांची बदली करण्यात आली. तर रात्री उशिरा ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांचीही बदली करण्यात आली. कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. परंतु आता यावरुन राजकारण चांगलेच तापू लागले आहे. भाजप आणि मनसेने या बदलीच्या निमित्ताने यात उडी घेतली आहे.  कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईत आयुक्त बदललेत, तर मग ठाण्यात पालकमंत्नी बदलणार का?, या भाजपा नेते आशिष शेलार यांच्या सवालाची दखल घेऊन, राज्य सरकारने ठाणो महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची तडकाफडकी बदली करून, पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोकळे सोडले, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी ट्विटरद्वारे केली आहे. ठाणो महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची अवघ्या 3 महिने 3 दिवसांत ठाण्यातून बदली करण्यात आली. ठाणो महापालिका क्षेत्रत कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आयुक्तांनाच जबाबदार धरण्यात आले. परंतु त्यांच्या बरोबर यामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे देखील तितकेच जबाबदार असल्याचा आरोप डावखरे यांनी केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात कोरोनाचे मोठ्या संख्येने रु ग्ण आहेत. महापालिकेकडून मुंब्रा येथील मृतांची नोंद कमी केली जाते. आपल्या स्वत:च्या मतदारसंघात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात दोन्ही मंत्री अपयशी ठरले. मात्र, त्यांना महाविकास आघाडी सरकारने अभय का दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक  नारायण पवार यांनी देखील या दोनही मंत्र्यांवर टिका करतांना हे पालिकेला दोष देताना या दोघांचीही जबाबदारी तितकीच महत्वाची होती. परंतु आपले अपयश झाकण्यासाठीच आयुक्तांची बदली करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेतील काही विशिष्ट अधिका:यांच्या लॉबीच्या हितसंबंधांचा फटका देखील मावळत्या आयुक्तांना बसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.भाजप पाठोपाठ मनसेने देखील या बदलीवरुन सत्ताधाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आयुक्तांच्या बदली आड आपले अपयश झाकण्याचा सत्तधाऱ्यांचा प्रयत्न असल्याची टिका केली आहे. जिल्ह्यातील चार आयुक्तांच्या मंगळवारी बदली करण्यात आल्या आहेत. सरकार फेल झाल्याने कोणाच्या तरी माथी हे अपयश मारायचे म्हणून या चार बदल्या करण्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आयुक्त अपयशी ठरत असेल तर संपूर्ण प्रशासन त्याला जबाबदार असतात. याला जबाबदार म्हणून ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री देखील असून मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. नवीन रुग्णालयात साहित्यांचा तुटवडा असे असतांना हे अपयश हे या नेत्यांचे आहे. प्रशासनाच्या माथी मारुन जमणार नाही तर हे अपयश सरकारचे आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदे