शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

CoronaVirus News: "आयुक्तांची बदली करण्याऐवजी दोन्ही मंत्र्यांना पदांवरून दूर करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 15:44 IST

भाजप आणि मनसे झाली आक्रमक; अपयश झाकण्यासाठी आयुक्तांची बदली केल्या आरोप

ठाणे  : ठाणे  महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांच्या बदलीवरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोरोनाचे अपयश झाकण्यासाठीच आयुक्तांची बदली करण्यात आल्याचा आरोप आता भाजप आणि मनसेने केले आहे. वास्तविक पाहता हे नगरविकास विभागाचे अपयश असून त्यांनी ही जबाबदारी स्विकारणे  अपेक्षित आहे. तसेच ठाण्यातील दोनही मंत्र्यांचे हे अपयश असून त्यांचे मंत्रीपद काढावे असा सुर आता या दोनही पक्षांनी लावला आहे.ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर महापालिका भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यानुसार उल्हासनगर आणि मिराभाईंदर महापालिकेच्या आयुक्तांची बदली करण्यात आली. तर रात्री उशिरा ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांचीही बदली करण्यात आली. कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. परंतु आता यावरुन राजकारण चांगलेच तापू लागले आहे. भाजप आणि मनसेने या बदलीच्या निमित्ताने यात उडी घेतली आहे.  कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईत आयुक्त बदललेत, तर मग ठाण्यात पालकमंत्नी बदलणार का?, या भाजपा नेते आशिष शेलार यांच्या सवालाची दखल घेऊन, राज्य सरकारने ठाणो महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची तडकाफडकी बदली करून, पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोकळे सोडले, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी ट्विटरद्वारे केली आहे. ठाणो महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची अवघ्या 3 महिने 3 दिवसांत ठाण्यातून बदली करण्यात आली. ठाणो महापालिका क्षेत्रत कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आयुक्तांनाच जबाबदार धरण्यात आले. परंतु त्यांच्या बरोबर यामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे देखील तितकेच जबाबदार असल्याचा आरोप डावखरे यांनी केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात कोरोनाचे मोठ्या संख्येने रु ग्ण आहेत. महापालिकेकडून मुंब्रा येथील मृतांची नोंद कमी केली जाते. आपल्या स्वत:च्या मतदारसंघात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात दोन्ही मंत्री अपयशी ठरले. मात्र, त्यांना महाविकास आघाडी सरकारने अभय का दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक  नारायण पवार यांनी देखील या दोनही मंत्र्यांवर टिका करतांना हे पालिकेला दोष देताना या दोघांचीही जबाबदारी तितकीच महत्वाची होती. परंतु आपले अपयश झाकण्यासाठीच आयुक्तांची बदली करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेतील काही विशिष्ट अधिका:यांच्या लॉबीच्या हितसंबंधांचा फटका देखील मावळत्या आयुक्तांना बसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.भाजप पाठोपाठ मनसेने देखील या बदलीवरुन सत्ताधाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आयुक्तांच्या बदली आड आपले अपयश झाकण्याचा सत्तधाऱ्यांचा प्रयत्न असल्याची टिका केली आहे. जिल्ह्यातील चार आयुक्तांच्या मंगळवारी बदली करण्यात आल्या आहेत. सरकार फेल झाल्याने कोणाच्या तरी माथी हे अपयश मारायचे म्हणून या चार बदल्या करण्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आयुक्त अपयशी ठरत असेल तर संपूर्ण प्रशासन त्याला जबाबदार असतात. याला जबाबदार म्हणून ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री देखील असून मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. नवीन रुग्णालयात साहित्यांचा तुटवडा असे असतांना हे अपयश हे या नेत्यांचे आहे. प्रशासनाच्या माथी मारुन जमणार नाही तर हे अपयश सरकारचे आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदे