शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

कंत्राटदारांना ‘अमृत’चे वावडे, २७ गावांसाठी १६० कोटींची पाणीयोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 3:33 AM

केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीसमस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत १६० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

मुरलीधर भवारकल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीसमस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत १६० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे करण्यासाठी महापालिकेने फेरनिविदा मागवूनही त्याला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिस-यांदा निविदा मागवावी लागणार आहे.राज्य सरकारकडून ‘क’ व ‘ड’ वर्गासाठी अमृत योजना राबवली जाणार आहे. केडीएमसीचा समावेश ‘क’ वर्गात होते. या महापालिकांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. अमृत योजना १६० कोटी रुपयांची असली तरी सरकार ५० टक्के म्हणजे ८० कोटी रुपये दणार आहे. तर उर्वरित ८० कोटींचा निधी केडीएमसीला भरावा लागणार आहे. महापालिकेने त्यासाठी निविदा मागविल्या. पहिल्या प्रयत्नात महापालिकेच्या निविदेला एका कंत्राट कंपनीने प्रतिसाद दिला. मात्र, अन्य प्रतिस्पर्धी कंत्राटदार नसल्याने या निविदा प्रक्रियेचा उपयोग झाला नाही. त्यामुळे महापालिकेने फेरनिविदा मागविली आहे. त्यालाही कोणीही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे तिसºयांदा निविदा मागवावी लागणार आहे. त्यात एक जरी कंत्राट कंपनीची निविदा आल्यास या कंपनीचा विचार होऊ शकतो. विकासकामांपोटीची ४५ कोटींची बिले महापालिका कंत्राटादारांना देणे आहे. महापालिका अर्थिक अडचणीत असल्याने बिले मिळणार नाहीत, या भितीपोटी निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण सांगितले जात आहे.अमृत योजनेसाठी महापालिकेस ८० कोटी रुपये उभे करायचे आहेत. त्यासाठी महापालिकेने अथर्संकल्पात तरतूद केली आाहे का, याबाबत प्रशासन साशंक आहे. दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीतील ३०० कोटींची तूट भरून काढण्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत कोणतीही नवीन कामे न घेण्याचा निर्णय आयुक्त पी. वेलरासू यांनी घेतला आहे. वसुलीचे लक्ष्य वाढवून ही तूट भरून काढली जाणार आहे. सरकारकडून अनुदान मिळावे. तसेच वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन ही तूट भरून काढण्याचे प्रयत्न केले जात आहे.महापालिका क्षेत्रात १३ महिने नव्या इमारतींच्या बांधकामास बंदी होती. त्यामुळे आर्थिक खड्डा पडला. त्यात २७ गावे महापालिकेत समाविष्ट केली. या गावांचे अनुदान सरकारने दिलेले नाही. एलबीटी कराचे अनुदान सरकार दरबारी थकले आहे. महापालिका ‘क’ वर्गात आल्याने वित्तीय आयोगाचे पैसे देणे सरकारने बंद केले. सरकारने किमान एक वर्षाचे अनुदान तरी महापालिकेस द्यावे. सरकारने या सगळ््या थकबाकीच्या बदल्यात अमृत पाणीपुरवठा योजनेचा ८० कोटीचा हिस्सा महापालिकेच्या वतीने भरावा, अशी मागणी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली आहे. मात्र, त्याला राज्य सरकारने अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.महापालिका क्षेत्रात २७ गावे धरून ३४५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी २७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्याचे बील महापालिका एमआयडीसीकडे भरते. महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुर्त्थान अभियानांतर्गत १५० दशलक्ष लिटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना राबविली. यामुळे महापालिका पाणीपुरवठ्यात स्वयंपूर्ण झाली. मात्र, ही योजना राबविली तेव्हा २७ गावे महापालिकेत नव्हती. गावे जून २०१५ मध्ये महापालिकेत आली. या गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजना आहे. तिच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली. पहिला टप्पा हा १६० कोटींचा आहे. पहिल्या टप्प्यात वितरण व्यवस्था सुधारली जाईल तर दुसºया टप्प्यात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाण्याची शक्यता आहे.गावे महापालिकेत आल्यानंतर सहा महिन्यानंतरच महापालिकेने अमृत योजना राबविण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याने महापालिकेच्या हिश्याच्या रक्कमेचे काय, असा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. महापालिकेस योजना हवी आहे. मात्र अर्थिक कोंडीचे कारण सांगून हिश्याच्या रक्कमेचा भार सरकारच्या पारड्यात ढकलायचा आहे.>यंदाही उन्हाळ्यात टंचाईच्या झळा२७ गावांतील पाणीप्रश्न दोन वर्षे गाजत आहे. लोकप्रतिनिधीही नागरिकांना उत्तरे देऊन कंटाळले आहेत. मोर्चे व आंदोलन करून झाली आहेत. दरम्यान ३३ कोटी रुपये खर्चाच्या जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला ‘स्थायी’ने मंजुरी दिली होती. या कामावरून राजकीय वादंग झाला.आता अमृत योजना मंजूर होऊन त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात असल्याने ३३ कोटी रुपये खर्चाचे जलवाहिनी टाकण्याचे काम आपोआपच रद्द झाले आहे. त्याची काही आवश्यकता नाही, असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले आहे. परंतु, निविदेला प्रतिसाद मिळत नाही. तिसºयांदा निविदा काढल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळाल्यास कंत्राटदार नेमला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. मात्र, त्याला विलंब लागणार असल्याने यंदाही उन्हाळ््यात गावांना टंचाईच्या झळा बसणार आहेत.

टॅग्स :Waterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका