शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

आदिवासींच्या नशिबी दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 5:14 AM

पाड्यातील ग्रामस्थ दोनदोन किलोमीटर अंतरावरून खड्ड्यांतून दूषित पाणी आणतात.

मुरबाड : तालुक्यात २० गावे व ३३ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून पाडाळे धरणाजवळ असलेल्या खोपिवलीतील नागरिक ७० ते १०० रु पये मोजून शेजारील दोन किलोमीटर अंतरावरील मिल्हे गावातून बॅरलने पाणी आणून तहान भागवतात. माजगाव, कातकरीवाडी, पाटगाव पठार, माळशेजघाट पायथ्याशी जवळचे वाडे, पाड्यातील ग्रामस्थ दोनदोन किलोमीटर अंतरावरून खड्ड्यांतून दूषित पाणी आणतात.नदीनाले आटले असून विहिरींनी तळ गाठला आहे. रोजगार उपलब्ध नसल्याने शेकडो आदिवासी कातकऱ्यांचे वीटभट्ट्यांवर स्थलांतर झाले आहे. काही कुटुंबे तग धरून आहेत. त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी तहसीलदार सचिन चौधर यांच्याकडे केली आहे. दरम्यान, कामतपाडा, कातकरीवाडीला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश पवार यांनी दिले.शहापूर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठाभातसानगर : शहापूर तालुक्यात सध्या १८ गावे, ६४ पाड्यांना १९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अजूनही १० गावे आणि २२ पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. यंदाच्या टंचाई आराखड्यात ९० लाख खर्च करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. सध्या तालुक्यात ज्या ज्या गावपाड्यात पाणीटंचाई आहे त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. ज्यांचे प्रस्ताव आले आहेत त्यांनाही पाणी पुरवठा सुरु होईल. अशी माहिती गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांनी दिली.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण