शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचे सत्ताधारी आणि प्रशासनासोबत संगनमत, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 8:13 PM

Mira Bhayandar News : कोट्यवधी रुपयांचा दिलेला ठेका रद्द करून बस सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावेत असे पत्र आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा ठेकेदाराने बंद पाडली असून शहरातील नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदारासोबत सत्ताधारी आणि प्रशासनाचे अर्थपूर्ण संगनमत असल्याने चौकशी करावी. कोट्यवधी रुपयांचा दिलेला ठेका रद्द करून बस सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावेत असे पत्र आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. तर ठेकेदाराने पगार दिला नाही म्हणून कर्मचारी देखील धरणे धरून आहेत. 

मीरा भाईंदर महापालिकेने बससेवा चालवण्यासाठी नेमलेल्या भागीरथी एमबीएमटी या ठेकेदाराला महापालिकेने मोफत बस व अत्याधुनिक डेपो आदी सर्व दिलेले असताना पालिका त्याला प्रति किमी २६ रुपये देखील देते. तिकीटाचे उत्पन्न, जाहिरातीचे पैसे देखील ठेकेदाराचे घेतो. ठेकेदाराचे इतके लाड का? असा सवाल नागरिक आधीपासून करत असताना दुसरीकडे ठेकेदाराने शहरातील बससेवा अजूनही सुरू केलेली नाही. 

कोरोनामुळे  कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी तसेच परराज्यातील नागरिकांना वसई रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी बस सेवा चालवली  जात होती. चाललेल्या बसप्रमाणे ठेकेदारास पालिकेने पैसे दिले. परंतु ठेकेदाराने पुरवणी करार करून विविध खर्च व कामाचे अतिरिक्त पैसे मागितले. तर कोरोना काळात मोजक्याच कर्मचाऱ्याने बोलावून काम दिले बहुतांश कर्मचाऱ्यांना नाही असा आरोप करत मार्च - एप्रिल पासूनच पगार कर्मचारी मागत आहेत. त्यासाठी त्यांनी सातत्याने धरणे आंदोलन केली. आत देखील २४ सप्टेंबरपासून बसडेपोच्या बाहेर कर्मचारी धरणे धरून आहेत.

पालिकेने सतत सांगून देखील ठेकेदाराने बससेवा सुरू केली नाही. १४ ऑगस्ट पासून केवळ उत्तन मार्गावर ५ बस सुरू केल्या त्या देखील ८ सप्टेंबरपासून बंद करण्यात आल्या. जेणे करून शहरातील नागरिकांचे पालिकेची बस नसल्याने प्रचंड हाल होत असून त्यांना नाईलाजाने रिक्षाचा भुर्दंड सहन करावा लागतोय. सर्वात जास्त हाल तर उत्तन - पाली - चौक वासियांचे होत आहेत.  

पालिका प्रशासनाने मोठ्या जोशात सांगितले होते की, ठेकेदारास ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली असून ठेका रद्द करून पालिका बस चालवेल. पगारासाठी धरणे धरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील पालिकेने बस सुरू केली तर आम्ही सहकार्य करू अशी भूमिका घेतली. पालिकेने कर्मचाऱ्याने सोबत बैठका घेऊन देखील घुमजाव करत पुन्हा ठेकेदारासच बस सेवा चालवण्यास दिली. परंतु कर्मचाऱ्यांनी पगारासाठी धरणे धरले तर ठेकेदार बससेवा सुरू करू शकलेला नाही. 

आमदार सरनाईक व आमदार गीता यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा यांचे ठेकेदाराशी संगनमत असल्याने ठेका रद्द करून पालिकेने बससेवा सुरू केली नाही. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने ठेका रद्द करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. 

सत्ताधारी भाजपाची काही मंडळीच ठेकेदाराच्या फायद्यासाठी धावपळ करत असून महासभेत देखील त्यांनी ठेकेदारांची पाठराखण केली असल्याचे सरनाईक म्हणाले. महापौर ज्योत्सना हसनाळे ह्यांनी देखील आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपायुक्त अजित मुठे, नगरसेवक सचिन म्हात्रे,  ठेकेदार मनोहर सकपाळ यांच्या सोबत भेट घेतली. महापौरांनी देखील, ठेकेदार व प्रशासनाने तातडीने तोडगा काढून नागरिकांसाठी परिवहन सेवा सुरु करा अन्यथा मला माझा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा दिला आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरpratap sarnaikप्रताप सरनाईकthaneठाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरे