शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बंटी-बबली माझे काही वाकडे करू शकणार नाही, काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 20:15 IST

Mira Bhayander News: हे बंटी - बबली माझे काहीही वाकडे करू शकणार नाही असा समाचार काँग्रेस नेते Muzaffar Hussain यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री Jitendra Awhad यांना प्रत्युत्तर देत घेतला.

मीरारोड -  मला सुलतान ए आझम म्हणत माझी सल्तनत खालसा करणार असे म्हटले गेले . पण मी सांगू इच्छितो कि, सुलतान ए हिंद अजमेर शरीफ यांचे छायाछत्र माझ्यावर असताना हे बंटी - बबली माझे काहीही वाकडे करू शकणार नाही असा समाचार काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर देत घेतला.

मंत्री आव्हाड यांनी मीरारोडच्या नया नगर मधील जाहीर सभेत मुझफ्फर यांचे नाव न घेता त्यांना सुलतान ए आझम व सुलतान ए नया नगर असा टोला लावत त्यांची सल्तनत खालसा करण्याचे आवाहन केले होते . त्या वरून मुझफ्फर यांनी आव्हाड यांचा खरपूस समाचार घेतला आहे .

एकीकडे मित्रपक्षाच्या नेत्या विरोधात बोलायचे आणि दुसरी कडे काँग्रेस व महाआघाडी विरोधात बोलत नाही असे म्हणतात . भाजपाला पराभूत करायचे असेल तर सर्वानी एकत्र येऊन महाविकास आघाडी पालिका निवडणुकीत झाली पाहिजे, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन नको असे सांगतात आणि दुसरीकडे काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना पाडायची भाषा करतात .  ह्यावरून बंटी - बबली स्वतः कन्फ्युज आहेत किंवा लोकांना कन्फ्युज करून भाजपाला फायदा करून देण्याचा त्यांचा हेतू असावा असा टोला मुझफ्फर यांनी लगावला.

सत्ता नसताना दोन वर्षां पूर्वी त्यांनी अधिवेशनात आलिशान क्लब प्रकरणी भाजपा नेत्यावर आरोप केले होते त्या बाबत आज सत्ता येऊन दोन वर्षे उलटली तरी ते चिडीचूप आहेत असे पत्रकारांनीच त्यांना विचारून संशय व्यक्त केला आहे . आमचे मीरारोड हे देशातले विकसित शहर आहे . एक किलो मीटरच्या परिसरात मोठे रस्ते , सुशोभित रेल्वे स्थानक , सरकारी रुग्णालय - रक्तपेढी , वाचनालय , अत्याधुनिक सुसज्ज रुग्णालय , उच्च शिक्षणा साठी विविध महाविद्यालये , मैदान , उद्याने हे मीरारोड मध्ये आहे . आधी मुंब्रा - कौसा कडे बघा असा चिमटा मुझफ्फर यांनी आव्हाड यांचे नाव न घेता काढला.

स्वतःचा इलाका मोठा आहे मोठमोठ्याने ओरडून सांगतात आणि शहरात येऊन त्यांना केवळ एका भागातील १२ जागाच दिसतात. महाविकास आघाडी असली तरी प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे . लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विनंती वरून काँग्रेसने मीरा भाईंदर मध्ये नेहमी साथ दिली आहे . माझ्यावर रोष ठेवण्याचे कारण कळले नाही असे मुझफ्फर म्हणाले . 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMira Bhayanderमीरा-भाईंदर