शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

बंटी-बबली माझे काही वाकडे करू शकणार नाही, काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 20:15 IST

Mira Bhayander News: हे बंटी - बबली माझे काहीही वाकडे करू शकणार नाही असा समाचार काँग्रेस नेते Muzaffar Hussain यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री Jitendra Awhad यांना प्रत्युत्तर देत घेतला.

मीरारोड -  मला सुलतान ए आझम म्हणत माझी सल्तनत खालसा करणार असे म्हटले गेले . पण मी सांगू इच्छितो कि, सुलतान ए हिंद अजमेर शरीफ यांचे छायाछत्र माझ्यावर असताना हे बंटी - बबली माझे काहीही वाकडे करू शकणार नाही असा समाचार काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर देत घेतला.

मंत्री आव्हाड यांनी मीरारोडच्या नया नगर मधील जाहीर सभेत मुझफ्फर यांचे नाव न घेता त्यांना सुलतान ए आझम व सुलतान ए नया नगर असा टोला लावत त्यांची सल्तनत खालसा करण्याचे आवाहन केले होते . त्या वरून मुझफ्फर यांनी आव्हाड यांचा खरपूस समाचार घेतला आहे .

एकीकडे मित्रपक्षाच्या नेत्या विरोधात बोलायचे आणि दुसरी कडे काँग्रेस व महाआघाडी विरोधात बोलत नाही असे म्हणतात . भाजपाला पराभूत करायचे असेल तर सर्वानी एकत्र येऊन महाविकास आघाडी पालिका निवडणुकीत झाली पाहिजे, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन नको असे सांगतात आणि दुसरीकडे काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना पाडायची भाषा करतात .  ह्यावरून बंटी - बबली स्वतः कन्फ्युज आहेत किंवा लोकांना कन्फ्युज करून भाजपाला फायदा करून देण्याचा त्यांचा हेतू असावा असा टोला मुझफ्फर यांनी लगावला.

सत्ता नसताना दोन वर्षां पूर्वी त्यांनी अधिवेशनात आलिशान क्लब प्रकरणी भाजपा नेत्यावर आरोप केले होते त्या बाबत आज सत्ता येऊन दोन वर्षे उलटली तरी ते चिडीचूप आहेत असे पत्रकारांनीच त्यांना विचारून संशय व्यक्त केला आहे . आमचे मीरारोड हे देशातले विकसित शहर आहे . एक किलो मीटरच्या परिसरात मोठे रस्ते , सुशोभित रेल्वे स्थानक , सरकारी रुग्णालय - रक्तपेढी , वाचनालय , अत्याधुनिक सुसज्ज रुग्णालय , उच्च शिक्षणा साठी विविध महाविद्यालये , मैदान , उद्याने हे मीरारोड मध्ये आहे . आधी मुंब्रा - कौसा कडे बघा असा चिमटा मुझफ्फर यांनी आव्हाड यांचे नाव न घेता काढला.

स्वतःचा इलाका मोठा आहे मोठमोठ्याने ओरडून सांगतात आणि शहरात येऊन त्यांना केवळ एका भागातील १२ जागाच दिसतात. महाविकास आघाडी असली तरी प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे . लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विनंती वरून काँग्रेसने मीरा भाईंदर मध्ये नेहमी साथ दिली आहे . माझ्यावर रोष ठेवण्याचे कारण कळले नाही असे मुझफ्फर म्हणाले . 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMira Bhayanderमीरा-भाईंदर