शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

तंत्रज्ञानामुळे वैचारिक गुलामी- अरविंद जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:12 IST

अंबरनाथमध्ये ‘कोमसाप’च्या राज्यस्तरीय युवाशक्ती संमेलनाचे उद्घाटन

अंबरनाथ : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेऊन प्रत्येकाने आपल्यात चांगले बदल करणे गरजेचे आहे. मात्र आज तरूण पिढी या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करत असल्याने त्यांच्यात वैचारिक गुलामी वाढली आाहे. आजचा तरूण केवळ मोबाइलवर स्वत:ला व्यक्त करत आहे. मोबाइलमधून तरूणांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक ठिकाणी युवाशक्ती साहित्य संमेलनाची गरज आहे. अंबरनाथमध्ये हा प्रयत्न यशस्वी झाला असून त्याचे अनुकरण इतर ठिकाणीही करणे गरजचे आहे, असे मत प्रसिध्द लेखक अरविंद जगताप यांनी शनिवारी व्यक्त केले.अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन भरवण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन जगताप, कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आाणि स्वागताध्यक्ष सुनील चौधरी यांच्या हस्ते झाले. युवकांचा साहित्याकडे कल वाढावा यासाठी हे संमेलन भरविण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्घाटनासाठी तरूणांची गर्दी झाली होती.जगताप यांनी मत व्यक्त करताना तरूणांना केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्वाचे सल्ले दिले. आज युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे तरूणांना कोणता झेंडा हाताात घेऊ असे विचारावे लागते. तरूणांनी आपल्या वाटचालीत कोणताही झेंडा हाती घेतला तरी त्या झेंड्याचा दांडा मात्र विकासाचाच राहिल याची दक्षता घ्यावी. राजकीय क्षेत्रातील तरूणांचा वावर कसा असावा यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. आजची तरूण पिढी ही संवेदनशील आहे. मात्र त्यांची संवेदना ही मोबाइलमध्येच अडकून पडली आहे.मोबाइल आणि व्हाटस्अ‍ॅपच्या जमान्यात युवा पिढी हरवून गेली आहे. तरूणांमध्ये विनाोद बुध्दीही कमी झाली आहे. एखादा जोक समजण्यासाठी स्माईलीचा वापर करावा लागतो. त्याशिवाय जोकचा अर्थ समजत नाही. आज मोबाइलचा वापर करून स्वत:मध्ये अनेक चांगले बदल घडविणे शक्य आहे. मात्र विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकासामुळे गुलाम बनवण्याचे तंत्र विकसित झाले आहे, असे जगताप यांनी सांगितले. आजही जुन्या मानिसकतेचा पगडा कायम असून साहित्य संमेलन युवकांमध्ये बदल घडवू शकतील. एकमेकातील हरवत चाललेला संवाद पुन्हा सुरू होईल असा आशावाद जगताप यांनी व्यक्त केला. तरूणांना व्यक्त होण्यासाठी सातत्याने संधी दिल्यास भावी तरूण पिढी साहित्याचा गाढा अविरतपणे सुरू ठेवतील असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी अंबरनाथसारख्या शहरात साहित्य संमेलनाला चांगला वाव निर्माण झाला आहे. आजही या ठिकाणी संमेलनाला गर्दी जमते. अंबरनाथ आणि साहित्य यांचे बंधन सुनील चौधरी हे यापुढेही सांभाळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अंबरनाथ शहराला सामाजिक ,साहित्यिक आणि ऐतिहासिक वारसा असून सध्याच्या काळात साहित्य संमेलनांची जास्त गरज आहे. आज तरूणांसाठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचा तरूण साहित्यिक फायदा घेतील असा विश्वास मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केला. या संमेलानाला आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, अब्दुल शेख, तुकामराम म्हात्रे, कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर आदी उपस्थित होते.ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटनमहात्मा गांधी विद्यालयात सुरू असलेल्या युवाशक्ती साहित्य संमेलानाच्या उद््घाटनप्रसंगी ग्रंथ प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अरविंद जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शनिवारी पहिल्या दिवशी प्रदर्शनाला रसिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया