संचारबंदीमुळे पोलिसांच्या कामाचे तास तसेच ताणही वाढला; महिला कर्मचाऱ्यांची होतेय कुचंबणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 03:04 AM2020-03-27T03:04:16+5:302020-03-27T03:04:40+5:30

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातच २४ मार्च रोजी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. महाराष्टÑात ती आधीपासूनच म्हणजे २३ मार्चपासून लागू झाली आहे. या काळात नागरिकांनी बाहेर पडू नये, असे वारंवार पोलिसांकडून आवाहन केले जात आहे.

 Communication restrictions also increased police work hours and stress; Female employees were bitchy | संचारबंदीमुळे पोलिसांच्या कामाचे तास तसेच ताणही वाढला; महिला कर्मचाऱ्यांची होतेय कुचंबणा

संचारबंदीमुळे पोलिसांच्या कामाचे तास तसेच ताणही वाढला; महिला कर्मचाऱ्यांची होतेय कुचंबणा

Next

- जितेंद्र कालेकर

ठाणे : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील संचारबंदीमुळे ठाणे शहर पोलिसांवरही कमालीचा ताण वाढला आहे. सकाळी ६ ते रात्री १० अशी तब्बल १५ ते १६ तासांची ड्युटी झाल्यामुळे त्यांचेही हाल होत आहेत. त्यातही महिला पोलिसांना तर अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आल्याची माहिती अनेक कर्मचाºयांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातच २४ मार्च रोजी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. महाराष्टÑात ती आधीपासूनच म्हणजे २३ मार्चपासून लागू झाली आहे. या काळात नागरिकांनी बाहेर पडू नये, असे वारंवार पोलिसांकडून आवाहन केले जात आहे. त्यासाठी ठाणे शहरातील अनेक नाक्यांवर आणि मुख्य रस्त्यांवर पोलीस तैनात आहेत. या सर्व ठिकाणी नागरिकांनी तोंडाला मास्क लावले की नाही? तसेच ते कोणत्या कामासाठी बाहेर पडले? त्याची कारणे पोलिसांकडून जाणून घेतली जात आहेत. जिथे अनावश्यक फिरणारी मंडळी दिसतील त्यांना सहज सोप्या भाषेत ‘समज’ही दिली जात आहेत. गर्दी करणाºयांविरुद्ध कलम १०२ नुसार कारवाई केली जात आहे. तर काही ठिकाणी सौम्य लाठीमारही पोलिसांना करावा लागत आहे. हे सर्व करतांना प्रत्येक पोलीस ठाण्याचा संपूर्ण म्हणजे साधारण १०० ते १५० जणांचा कर्मचारी व अधिकारी वर्ग चौकाचौकात उभा आहे. अनेकांना सकाळी ६ ते रात्री १० वाजताची ड्युटी आहे.
एरव्ही, ती सकाळी ९ ते रात्री ९ व रात्री ९ ते सकाळी ९ अशी असते. अनेकदा सकाळी ९ पर्यंतची ड्युटी पुढे लांबण्याची शक्यता असते. त्यामुळे सलग १५ ते १६ तास कामावर राहून प्रचंड ताण वाढल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याच्या एका पोलिसाने सांगितले. वागळे परिमंडळातील एका ५७ वर्षीय हवालदाराला पालघर येथून मिळेल त्या वाहनाने रोज ठाणे गाठावे लागते. त्यामुळे ठाण्यापर्यंत चांगलीच दमछाक होत असल्याचे ते म्हणाले. अशीच परिस्थिती स्वत:चे वाहन नसलेल्या पोलिसांचीही झाली आहे.


पोलीस ठाण्यात आसरा
संचारबंदीचा फटका महिला कर्मचाºयांनाही बसला आहे. ड्युटीचे तास वाढल्यामुळे त्यांना नेहमीपेक्षा जास्त कालावधी कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. यात चांगलीच ओढाताण होत असल्याचे अनेक
महिला कर्मचाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले. अनेकींना तर पोलीस ठाण्यातच आसरा घ्यावा लागला आहे. अशीच परिस्थिती उपनिरीक्षक आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाºयांची आहे. किमान कामाचे तास नेहमी इतकेच ठेवावेत, इतकी माफक अपेक्षा पोलीस कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे.

Web Title:  Communication restrictions also increased police work hours and stress; Female employees were bitchy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.