शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

मुंब्य्रातील वीज समस्येवरुन आ. आव्हाडांनी दिला महावितरणच्या अधिकाऱ्याला इशारा, वीज समस्या न सोडविल्यास जलभरो करण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 5:10 PM

मुंब्य्रातील वीज सम्यसेबाबत आमदारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धमकी वजा इशारा दिल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजाळपोळ झाल्यास महावितरण असेल जबाबदारनवरात्रोत्सवात भारनियमन करु नये

ठाणे - मुंब्य्रातील वीज समस्येच्या मुद्यावरुन स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याना उद्या जाळपोळ झाली किंवा तुमच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले गेले तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्हीच असाल असा धमकी वजा इशारा दिला असतांनाच, मंगळवारी राष्ट्रवादीच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी पुढील दोन दिवसात वीजेची समस्या निकाली काढली गेली नाही तर जेल भरो आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला.                महावितरणने वीज टंचाई निर्माण होत असल्याने राज्यभर भारनियमन सुरु केले आहे. हे भारिनयमन सुमारे ६ ते ७ तासांचे आहे. त्याव्यतिरिक्त मुंब्रा भागात अतिरिक्त ७ ते ८ तासांचेही भारिनयमन केले जात आहे. त्यामुळे मुंब्रा शहर हे सुमारे १२ ते १४ तास अंधारात असते. परिणामी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी महावितरणच्या मुख्य अधिकारी पुष्पलता चव्हाण यांना फोन करुन नुकताच या संदर्भात दूरध्वनी केला होता. यावेळी त्यांनी मुंब्य्रातील वीज समस्येबाबत त्यांच्याशी चर्चा केली. आमची सहनशिलता संपली आहे, त्यामुळे उद्या जाळपोळ झाली किंवा तुमच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले गेले तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्हीच असाल असा इशारा दिला आहे. तसेच वीज समस्येचा नाहक त्रास येथील नागरीकांना सहन करावा लागत आहे. त्यात तुमचे हुंडेगिरी हे अधिकारी साधा फोन सुध्दा घेत नाहीत, त्यामुळे वीजेची समस्या तत्काळ सुटली नाही तर उद्या जे काही घडेल त्याला आपणच जबाबदार असाल असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर मंगळवारी शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक शानू पठाण, सिराज डोंगरे, आशिरन राऊत, राजन किणी, अनिता किणी आदींच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता हुंडेकरी यांची भेट घेतली. यावेळी परांजपें यांनी महावितरण कंपनीला भारिनयमनाबद्दल जाब विचारला.                 नवरात्रोत्सवाच्या काळात सायंकाळी ७ ते १० या वेळेत भारिनयमन करू नये, एमआयडीसीकडून ज्या वेळेत पाणी सोडण्यात येत, त्यावेळेत भारिनयमन करण्यात येऊ नये आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच, महावितरण कडे सुमारे ५ हजार लोकांनी नवीन वीज जोडणीसाठी शुल्क अदा केले आहे. मात्र , केवळ मीटर नसल्याने जोडण्या देण्यात आलेल्या नाहीत, त्या जोडण्या तत्काळ देण्यात याव्यात, अशीही मागणी यावेळी परांजपे यांनी केली. तसेच, या मागण्यांच्या संदर्भात आगामी दोन दिवसात मार्ग न काढल्यास जेल भरो आंदोलन करण्यात येईल , असा इशारा यावेळी कार्यकारी अभियंता हुंडेकरी यांना देण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड