शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा जनता आपल्याला जोडे मारेल; उद्धव ठाकरे यांच्या कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:19 IST

भाजपवर केली टीका, विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण

ठाणे : क्लस्टरच्या मागणीकरिता यापूर्वी आम्ही आंदोलने केली, बंद केले. आता सत्ता मिळाल्याने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा. अन्यथा, जनता आपल्याला जोड्याने मारेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील पक्षांना कानपिचक्या दिल्या.

क्लस्टरसाठी आणि एसआरएसाठी स्वतंत्र प्राधिकरणे स्थापन केली जातील. तसेच मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) संपूर्ण क्षेत्रात क्लस्टर योजना राबविण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात एसआरए योजनेचा विकास करताना एमएमआर रिजनमध्येही क्लस्टरची योजना राबविली जाणार आहे. शिवाय, एमएमआर क्षेत्राचे वेगळे प्राधिकरण केले जाणार आहे. त्यामुळे या भागाचा विकास त्याच ठिकाणी होण्यास मदत होणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पूर्वी आम्ही कधीतरी लपूनछपून भेटत होतो. मात्र, आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने उघडपणे भेटत आहोत. परंतु, पूर्वी जे उघडपणे भेटत होते, ते आता गायब झाले आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी भाजपचा थेट उल्लेख न करता केली. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगोदर छुप्या व आता उघड असलेल्या मैत्रीचा हवाला देत भाजपवर शरसंधान केले होते. तोच धागा पकडून ठाकरे यांनीही भाजपला लक्ष्य केले.

ठाणे शहरातील किसननगर भागातील क्लस्टरचे भूमिपूजन, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण केल्यानंतर डॉ. काशिनाथ घाणेकर येथे ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे भूमिपूजन, डेब्रिज प्रकल्पाचे लोकार्पण, प्रकल्पबाधितांना बीएसयूपीअंतर्गत घरांचे चावीवाटप, दिव्यांगांना सदनिका आणि स्टॉलचे वाटप, आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण, शहरातील सात ठिकाणच्या खाडीकिनाऱ्यांचा वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, अर्बन जंगल आणि सायन्स पार्कचे भूमिपूजन, अनाथ-निराधार लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप, लाडकी लेक दत्तक योजनेंतर्गत अनुदानाचे वाटप, कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर, ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हबचे लोकार्पण आणि संकेतस्थळाचे अनावरण अशा नानाविध योजनांचे ई-लोकार्पण आणि भूमिपूजन केल्यानंतर ठाकरे बोलत होते.

ठाणे आणि शिवसेनेचे मागील २५ वर्षांपासूनचे अतूट नाते आहे, त्यामुळेच या ठाणेकर जनतेने टाकलेला विश्वास आम्ही सार्थकी ठरवत आहोत. ठाण्याचे रूप बदलले आहे. परंतु, ठाणेकर हे अजून साधेच आहेत. ठाणेकर एकदा प्रेम दिले की, भरभरून देतात. आज बाळासाहेब व आनंद दिघे यांची आठवण आल्याशिवाय राहत नसल्याचेही त्यांनी सांगितले.ठाणे महापालिका आयुक्तांचे कौतुक करताना मुंबई शहर मोठे असतानाही त्याचा विकास अद्यापही हवा तसा झालेला नाही. त्यामुळे मुंबईच्या आयुक्तांना मी ठाण्यात येऊन येथील प्रकल्पांची पाहणी करावी, अशा सूचना केल्याचेही ठाकरे म्हणाले.

ठाण्याचा विकास बघितल्यावर पोटात नाही दुखत, उलट छाती अभिमानाने भरून येते, त्यामुळे ठाणेकरांनी फक्त काय पाहिजे, ते सांगावे. ते देण्याची आमची तयारी असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. ठाण्यात किसननगर भागात किंवा दिव्यात एकमेकींना चिकटून इमारती उभ्या आहेत. त्यावर क्लस्टर हा चांगला उपाय आहे, असे ते म्हणाले.ठाण्याचा झपाट्याने विकास करण्याकरिता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खूप कामे केली आहेत. त्यामुळे निवृत्तीपर्यंत त्यांना येथेच आयुक्तपदी ठेवा किंवा अन्य कोणते पद देऊन त्यांना ठाण्यात ठेवा, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खा. राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आ. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, माजी महापौर संजय मोरे, मीनाक्षी शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी मान्यवर उपस्थित होते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या लोकार्पणप्रसंगी नगरसेवक विकास रेपाळे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खा. राजन विचारे, उपमहापौर पल्लवी कदम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, अनंत तरे व स्थायी समिती सभापती राम रेपाळे आदी मान्यवर.

पोलीस, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी घरे राखीव

शासनाच्या गृहसंकुलांच्या प्रत्येक योजनेत पोलीस आणि चतुर्थश्रेणीच्या कर्मचाºयांना प्रत्येकी १० टक्के घरे राखीव ठेवली जातील, असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले.मोठे उद्योगधंदे उभे राहण्यात अडचणी येत असल्या, तरी स्टार्टअपच्या माध्यमातून छोटेमोठे उद्योगधंदे उभे करून रोजगारनिर्मिती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारthaneठाणेMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रJitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदे