शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

...अन्यथा जनता आपल्याला जोडे मारेल; उद्धव ठाकरे यांच्या कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:19 IST

भाजपवर केली टीका, विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण

ठाणे : क्लस्टरच्या मागणीकरिता यापूर्वी आम्ही आंदोलने केली, बंद केले. आता सत्ता मिळाल्याने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा. अन्यथा, जनता आपल्याला जोड्याने मारेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील पक्षांना कानपिचक्या दिल्या.

क्लस्टरसाठी आणि एसआरएसाठी स्वतंत्र प्राधिकरणे स्थापन केली जातील. तसेच मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) संपूर्ण क्षेत्रात क्लस्टर योजना राबविण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात एसआरए योजनेचा विकास करताना एमएमआर रिजनमध्येही क्लस्टरची योजना राबविली जाणार आहे. शिवाय, एमएमआर क्षेत्राचे वेगळे प्राधिकरण केले जाणार आहे. त्यामुळे या भागाचा विकास त्याच ठिकाणी होण्यास मदत होणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पूर्वी आम्ही कधीतरी लपूनछपून भेटत होतो. मात्र, आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने उघडपणे भेटत आहोत. परंतु, पूर्वी जे उघडपणे भेटत होते, ते आता गायब झाले आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी भाजपचा थेट उल्लेख न करता केली. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगोदर छुप्या व आता उघड असलेल्या मैत्रीचा हवाला देत भाजपवर शरसंधान केले होते. तोच धागा पकडून ठाकरे यांनीही भाजपला लक्ष्य केले.

ठाणे शहरातील किसननगर भागातील क्लस्टरचे भूमिपूजन, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण केल्यानंतर डॉ. काशिनाथ घाणेकर येथे ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे भूमिपूजन, डेब्रिज प्रकल्पाचे लोकार्पण, प्रकल्पबाधितांना बीएसयूपीअंतर्गत घरांचे चावीवाटप, दिव्यांगांना सदनिका आणि स्टॉलचे वाटप, आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण, शहरातील सात ठिकाणच्या खाडीकिनाऱ्यांचा वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, अर्बन जंगल आणि सायन्स पार्कचे भूमिपूजन, अनाथ-निराधार लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप, लाडकी लेक दत्तक योजनेंतर्गत अनुदानाचे वाटप, कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर, ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हबचे लोकार्पण आणि संकेतस्थळाचे अनावरण अशा नानाविध योजनांचे ई-लोकार्पण आणि भूमिपूजन केल्यानंतर ठाकरे बोलत होते.

ठाणे आणि शिवसेनेचे मागील २५ वर्षांपासूनचे अतूट नाते आहे, त्यामुळेच या ठाणेकर जनतेने टाकलेला विश्वास आम्ही सार्थकी ठरवत आहोत. ठाण्याचे रूप बदलले आहे. परंतु, ठाणेकर हे अजून साधेच आहेत. ठाणेकर एकदा प्रेम दिले की, भरभरून देतात. आज बाळासाहेब व आनंद दिघे यांची आठवण आल्याशिवाय राहत नसल्याचेही त्यांनी सांगितले.ठाणे महापालिका आयुक्तांचे कौतुक करताना मुंबई शहर मोठे असतानाही त्याचा विकास अद्यापही हवा तसा झालेला नाही. त्यामुळे मुंबईच्या आयुक्तांना मी ठाण्यात येऊन येथील प्रकल्पांची पाहणी करावी, अशा सूचना केल्याचेही ठाकरे म्हणाले.

ठाण्याचा विकास बघितल्यावर पोटात नाही दुखत, उलट छाती अभिमानाने भरून येते, त्यामुळे ठाणेकरांनी फक्त काय पाहिजे, ते सांगावे. ते देण्याची आमची तयारी असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. ठाण्यात किसननगर भागात किंवा दिव्यात एकमेकींना चिकटून इमारती उभ्या आहेत. त्यावर क्लस्टर हा चांगला उपाय आहे, असे ते म्हणाले.ठाण्याचा झपाट्याने विकास करण्याकरिता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खूप कामे केली आहेत. त्यामुळे निवृत्तीपर्यंत त्यांना येथेच आयुक्तपदी ठेवा किंवा अन्य कोणते पद देऊन त्यांना ठाण्यात ठेवा, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खा. राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आ. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, माजी महापौर संजय मोरे, मीनाक्षी शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी मान्यवर उपस्थित होते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या लोकार्पणप्रसंगी नगरसेवक विकास रेपाळे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खा. राजन विचारे, उपमहापौर पल्लवी कदम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, अनंत तरे व स्थायी समिती सभापती राम रेपाळे आदी मान्यवर.

पोलीस, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी घरे राखीव

शासनाच्या गृहसंकुलांच्या प्रत्येक योजनेत पोलीस आणि चतुर्थश्रेणीच्या कर्मचाºयांना प्रत्येकी १० टक्के घरे राखीव ठेवली जातील, असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले.मोठे उद्योगधंदे उभे राहण्यात अडचणी येत असल्या, तरी स्टार्टअपच्या माध्यमातून छोटेमोठे उद्योगधंदे उभे करून रोजगारनिर्मिती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारthaneठाणेMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रJitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदे