शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

शिकण्याच्या वयातच बोहल्यावर; १९ वर्षांखालील २,४६२ गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 10:14 IST

पालघरमध्ये बालविवाहाची समस्या गंभीर; मातामृत्यूचा वाढता धोका

पालघर : जिल्ह्यातील आदिवासीबहुल ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे.  समाजातील छुप्या घटकांच्या पाठिंब्यानेच हे विवाह होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यात १९ वर्षांखालील २,४६२ मुली गर्भवती असल्याच्या आकडेवारीतून बालविवाहाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शिकण्याच्या वयातच या मुली बोहल्यावर चढत असल्यामुळे भविष्यात बालमृत्यू, मातामृत्यू, कुपोषणाची गंभीर बाब डोके वर काढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील पूर्वपट्ट्यातील आदिवासीबहुल भागात अल्पवयीन मुलींचा साखरपुडा (मागणा) केला जातो. साखरपुड्यानंतर ती मुलगी होणाऱ्या नवऱ्याच्या घरी नियमितपणे जाते. यातूनच शरीरसंबंध निर्माण होत असल्याने अल्पवयीन मुली गर्भवती राहत आहेत. अशा १९ वर्षांखालील मुलींची संख्या ही २,४६२ इतकी आहे. प्रत्यक्षात ही आकडेवारी मोठी असल्याची माहिती एका लोकप्रतिनिधीने आपले नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.

७४३ महिला डहाणू तालुक्यातील

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी हे पाच तालुके दुर्गम आहेत. या तालुक्यांत माता, नवजात बालके यांचे मृत्यू होण्याच्या घटना नेहमीच घडतात. कमी वयातील प्रसूती हे त्यामागील प्रमुख कारण आहे. जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांतील ३६ हजार १६८ गर्भवती महिलांपैकी २ हजार ४६२ गर्भवती या १९ वर्षांखालील आहेत. यात सर्वाधिक ७४३ महिला या एकट्या डहाणू तालुक्यातील आहेत. 

कायद्याची भीतीच उरली नाही

लग्न लावणारे भटजी, लग्नपत्रिका छापणारे, स्वयंपाकी आदींना पोलिस कायद्याची भीतीच उरली नसल्याने मोठ्या प्रमाणात बालविवाह होत आहेत. त्यामुळे त्यांना पोलिसांनी लेखी पत्र पाठवून कायद्याची समज द्यायला हवी. लोकप्रतिनिधींकडून ग्रामपंचायतींना भेटी देताना बालविवाह रोखण्याबाबत प्रचार, प्रसार केला जातो; मात्र हे रोखण्याचे अधिकार आम्हाला नसल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

कोणत्या तालुक्यात किती गर्भवती मुली?

७४३ डहाणू ३६३ जव्हार ३०९ तलासरी ३०४ पालघर २८४ विक्रमगड २२६ वाडा २०२ मोखाडा ३१ वसई  

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारीHealthआरोग्य