शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

कारखाने बंद करण्याला लवादाकडे आव्हान

By admin | Updated: July 9, 2016 03:41 IST

डोंबिवली औद्योगिक वसाहतीच्या दुसऱ्या फेजमधील सांडपाण्यावर योग्यप्रकारे प्रक्रिया होत नसल्याचे कारण देत प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याची नोटीस बजावली

डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक वसाहतीच्या दुसऱ्या फेजमधील सांडपाण्यावर योग्यप्रकारे प्रक्रिया होत नसल्याचे कारण देत प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे ८६ कारखान्यांवर गंडांतर आले असून त्याविरोधात सांडपाणी
प्रक्रिया केंद्र चालकांनी राष्ट्रीय
हरीत लवादाकडे धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी अपेक्षित आहे.
मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ योग्य पद्धतीने काम करत नसल्याने आणि कापड कारखान्यांच्या पाण्याचा फटका रासायनिक कारखान्यांना बसत असल्याचा कारखानदारांचा दावा आहे.
लवादाने नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार सांडपाणी प्रक्रिया केंद्राची बाजू ऐकून घ्यावी आणि त्यानंतरच प्रक्रिया केंद्र बंद करण्याची कारवाई करण्यास मंडळाला अनुमती द्यावी. तोवर या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी प्रक्रिया केंद्राने शुक्रवारी लवादाकडे केली.
दरम्यान, सांडपाणी प्रक्रिया केंद्रापाठोपाठ प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोंबिवलीच्या फेज दोनमधील ८६ कारखाने बंद करण्याची नोटीस बजावली आहे.
(प्रतिनिधी)

दोषी उद्योगांवर कारवाई करा, पण सरसकट सर्व कारखान्यांना जबाबदार धरणे चुकीचे!
प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करीत नाही हे लवादानेच काय केंद्रीय प्रदूषण मंडळानेही मान्य केले आहे. त्यामुळेच हे मंडळ बंद करण्याचे आदेश लवादाने दिले होते. सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रियेसाठी जास्तीचे पाणी येते. रासायनिक कारखाने कमी पाणी वापरतात. पण कापड प्रक्रिया करणारे कारखाने अधिक पाणी वपरतात. सांडपाणी प्रक्रिया केंद्राने बायोमॉस टॉवर उभारला आहे. त्यात जर कापड उद्योगाचे प्रमाणाबाहेर प्रदूषित पाणी आले तर त्यातील बँॅक्टेरिया मरतात. त्यामुळे प्रदूषित रसायन विघटीत होण्याची प्रक्रिया पुरेशा प्रमाणात होत नाही.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नावातच ‘नियंत्रण’ असा शब्द आहे. मात्र कोणत्या कंपन्या जास्तीचे प्रदूषित पाणी सोडतात. कोणत्या कंपन्या प्रदूषणाला जबाबदार आहेत, हे मंडळ शोधत नाही. मंडळाचे अधिकारी त्याची विचारणा सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडेच करतात.
कोणत्या कंपन्या प्रदूषण करतात त्याची फक्त नावे मंडळाचे अधिकारी सांगतात. पण त्यांच्यावर नियंत्रण न ठेवता फक्त दोन सोपे पर्याय अवलंबिले जातात. एकतर प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना कारखाना बंद करण्याची नोटीस बजावली जाते किंवा त्यांच्याकडून पाच लाख रुपयांची बँक गॅरंटी भरुन घेतली जाते. प्रदूषण नियंत्रणात सुधारणा आढळून न आल्यास बँक गॅरंटीची रक्कम व मुदत वाढविली जाते. मंडळ प्रदूषण नियंत्रणाचे काम न करता सगळे घोेंगडे कारखानदारांच्या गळयात मारुन मोकळे होते.
प्रक्रिया केंद्र बंद करणे हा प्रदूषण रोखण्यावर उपाय असू शकत नाही. तेथे प्रक्रिया योग्य प्रकारे केली जात नसेल, तर सुधारणेसाठी मुदत द्यावी. सध्या प्रक्रियेनंतर आॅक्सिजनचे प्रमाण हजारावर नसेल, तरी ते आधीच्या प्रमाणापेक्षा नियंत्रणात आहे, हे तरी मान्य करायला हवे. आता केंद्रच बंद केले तर रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडले जाईल. त्यावर उपाय म्हणून कारखाने बंदचा सोपा पर्याय निवडला जातो. रसायनमिश्रित सांडपाणी प्रक्रिया केंद्रात तयार होत नाही. ते ज्या कारखान्यातून तयार होते. त्या कारखान्यांचा शोध मंडळानेच घेतला पाहिजे. तरच कारवाईचे हे दृष्टचक्र भेदून प्रदूषण आटोक्यात आणता येईल, अशी आशा कारखानदारांनी व्यक्त केला आहे.