शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

मोबाइलवर अ‍ॅप्स डाऊनलोड करताना योग्य ती काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:49 AM

आपले संगणक सुरक्षित राखणे हे डिजिटल युगासाठी महत्वाचे असून व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे गरजेचे आहे.

ठाणे : आपले संगणक सुरक्षित राखणे हे डिजिटल युगासाठी महत्वाचे असून व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे गरजेचे आहे. मोबाइलवर अ‍ॅप्स डाऊनलोड करताना योग्य ती काळजी घ्यावी, गरजेचे व अधिकृतच अ‍ॅपच डाऊनलोड करावेत, असा सल्ला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. आल्हाद आपटे यांनी दिला.जिज्ञासा ट्रस्ट ठाणे व लोकजागर, ठाणे आयोजित सी.डी. देशमुख - दिलीप महाजन स्मृती व्याख्यान अंतर्गत ‘डिजिटल जग व सायबर सुरक्षा’ या याविषयावर ते मंगळवारी मराठी ग्रंथ संग्रहालयात बोलत होते. ते म्हणाले की, ज्या मोबाइलवरुन पैशांचे व्यवहार केले जातात त्या मोबाइलवर गेम्स किंवा इतर अ‍ॅप्स डाऊनलोड करू नयेत. आपला मोबाइल हा डिजीटल युगाचा भाग आहे. त्यामुळे त्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. सायबर अ‍ॅटॅक हे कमी सुरक्षित असलेल्या संगणकाला हॅक करून सिस्टीमचा ताबा घेतात. त्यामुळे आपला संगणक सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी परवाना असलेले सॉफ्टवेअर वापरा, पायरेटेड सॉफ्टवेअर वापरू नका. पायरेटेड सॉफ्टवेअर स्वस्त असतात म्हणून आपण त्याला भुलतो. परंतु, वायरसचेही अंडरवर्ल्ड असते. त्यामुळे दोन तीन दिवसांत खुप पैसा कमविला जातो. त्यामुळे सॉफ्टवेअर सातत्याने अपडेट केले पाहिजे. सायबर सुक्षेच्या गाभ्यात माहिती असते. त्यात माहितीची गोपीनीयता असावी, ज्याला माहिती मिळविण्याचा अधिकार आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही ती माहिती मिळवू नये. त्यात सतत्या असावी म्हणजे मिळविलेली माहिती पूर्ण व अचूक आहे याची खात्री देणारी असावी, अधिकृतरित्या ज्या स्थळी माहिती मिळणे महत्त्वाचे आहे तिथे मिळावे. या सायबर सुरक्षेच्या तीन महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात. या सुरक्षेसाठी प्रणाली बनवावी लागते. परंतु, ही प्रणाली गरजेपेक्षा कमी बनविली तर धोका वाढेल. कोणतीही सुरक्षा प्रणाली बनविताना धोका पडताळणे गरजेचे आहे. एवढं करूनही काही घडले तर त्याचे होणारे परिणाम कमीत कमी कसे करता येईल, परिणाम झाले तर त्याचे दुष्परिणाम कमी करावे आणि एवढे करुनही सिस्टीम बंद पडली तर ती कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात पुर्व पदावर कशी आणता येईल या तीन पातळ््यांवर सायबर सिस्टीम ही यंत्रणा बनविली जाते असे ते म्हणाले.