शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

ठाण्यात सव्वा पाच लाख खातेदारांना शेती सातबारा घरपोच देण्याची मोहिम- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 17:17 IST

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त शेतकरी बांधवांना डिजीटल स्वाक्षरीकृत गाव नमुना नंबर सातबारा उताऱ्याची प्रत मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ठाणे: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त शेतकरी बांधवांना डिजीटल स्वाक्षरीकृत गाव नमुना नंबर सातबारा उताऱ्याची प्रत मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५ लाख २४ हजार ४९१ खातेदारांना शेतीचा सातबारा मोफत घरपोच देण्याची मोहिम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

२ ऑक्टोबरपासून ही मोहिम जिल्हा प्रशासनाने सुरू केली असून आतापर्यंत ठाणे तालुक्यात ७००, कल्याण २०००, मुरबाड १८००, अंबरनाथ १७००, मिरा भाईंदर ४००, शहापूर १२००, भिवंडी १७०० असे सातही तालुक्यात एकूण ९५०० इतके सातबारा वितरीत करण्यात आले आहेत. या महिनाअखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मोफत सातबाऱ्याचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी क्षेत्रिय प्रशासनाला दिले आहेत.

ठाणे जिल्हयामध्ये एकूण ६ लाख ४५ हजार १७१ इतके सातबारे असून त्यापैकी ५ लाख ४ हजार ९१ शेतीचे सातबारा आहेत. डिजिटल भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई-महाभूमी अंतर्गत विकसीत करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेख विषयक शेतजमिनीचा सातबारा अद्ययावत उताऱ्याच्या प्रती गावामध्ये संबंधीत तलाठ्यामार्फत प्रत्येक खातेदारास घरोघरी जाऊन मोफत देण्याच्या दृष्टीने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांना मोफत सातबारा घरपोच वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसीलदारांना नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून तलाठ्यांमार्फत सातबारा  वाटपास सुरूवात झाली आहे, असे महसुल शाखेचे तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी  सांगितले.

शेतकरी बांधवांनी या मोफत डिजिटल स्वाक्षरी सातबारा वाटप मोहिमेमध्ये सहभागी व्हावे. वाटप केलेल्या सातबारा मध्ये काही त्रुटी किंवा विसंगती असल्यास खातेदाराचा अभिप्राय घेऊन त्याची पूर्तता केली जाईल. जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाFarmerशेतकरी