शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

बुलेट ट्रेन जमीन खरेदीत कब्जेदार शेतकऱ्यांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 6:13 PM

शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही; प्रांताधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन 

नितिन पंडीत

भिवंडी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखले जाणारे बुलेट ट्रेन प्रकल्प भिवंडी तालुक्यातील भरोडी ,अंजुर ,सुरई ,कशेळी ,काल्हेर ,केवणी, खारबाव या भागातून जात असून त्यासाठी शासनाने बाजार भाव पेक्षा ही अधिक दर देत जमिनीचा मोबदला जाहीर केल्या नंतर या भागातील भूमाफिया जमीन दलाल यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून थेट जमीन मालक सावकारा सोबत खरेदी व्यवहार केल्याने मागील तीन पिढ्या शेतजमिनीत घाम गाळून शेत पिकवणाऱ्या कब्जेदार शेतकरी याची फसवणूक होत होरपळ सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश निर्माण झाला आहे .

बुलेट ट्रेन प्रकल्पातील बाधित जमिनींचे हस्तांतरण करतांना व खरेदी विक्री करतांना सात बारा सदरी नाव असलेल्या सावकार व मालकांचाच विचार केला जात आहे मात्र तीन पिढ्यांतून अधिक काळ शेती कसणाऱ्या व कब्ज्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र नाव नसल्याचे कारण देत जमीन मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याने येथील बाधित कब्जेदार शेतकरी शासकीय यंत्रणेवर प्रचंड नाराज झाले आहेत . विशेष म्हणजे भिवंडीतील ग्रामीण भागात अनेक शेतकरी अशिक्षित असल्याने पूर्वी पासून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या इतरांच्या नावे आहेत . विशेष म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयात ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे गट बुक उपलब्ध नसल्याने आपल्या जमिनी नेमकी कोणाच्या नावावर आहेत हे देखील येथील शेतकऱ्यांना माहित नसल्याने जमीन दलाल भूमी अभिलेख व जमीन मालक यांच्याशी संगनमत करून थेट जमिनी विकत आहेत . मात्र या विक्री प्रक्रियेपासून कब्जेदार शेतकरी वंचित राहत असल्याचा आरोप येथील शेतकरी करीत आहेत . त्यातच बुलेट ट्रेन साठी होणारा खरेदी व्यवहार कब्जेदार शेतकरी यांना अंधारात ठेवून होत असल्याचा आरोप शेतकरी संघटना भरोडीचे मनोज भोईर यांनी केला आहे .

          बुलेट ट्रेनचे काम स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन न करता सुरू केले असून मौजे भरोडी येथील सर्व्हे क्रमांक १४९ व १३४  मधील भूसंपादन मिळकतीची थेट खरेदी न करता प्रकल्पाचे काम शेतजमिनीत सुरू आहे . कब्जा वहीवाटीच्या हरकती सुनावणी न घेताच थेट खरेदी केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून नुकताच शेतकरी संघटना भरोडी च्या शेतकरी शिष्टमंडळा सोबत उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नाळदकर यांच्या दालनात सोमवारी चर्चेसाठी आमंत्रित केले होते .या वेळी बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांसह भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस व बाधित कब्जेदार व अन्याय झालेले शेतकरी उपस्थित होते. यावेळी एकही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन भिवंडी प्रांताधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले आहे . 

          या बैठकीं दरम्यान उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी भरोडी गावातील भूसंपादन संदर्भातील वाद मिटविण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम राबवावी असे आदेश संबंधितांना देत बाधित शेतकऱ्यांनी एक ही खोटी केस सहन करायची नाही ,त्यासाठी कोणत्याही दलालाला पैसे मोजायचे नसून भूमापक अधिकारी यांनी पारदर्शक काम करून दोन दिवसात शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर द्यावे ,कब्जेदार यांना विश्वासात घेतले नसल्यास अथवा कब्जेदार शेतकऱ्यांचे नाव इतर हक्कात असल्यास नक्कीच सहकार्य करू असे डॉ मोहन नळदकर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देत कब्जेदार कुळ असल्यास कायदेशीर मदत करता येणे शक्य असून बुलेट ट्रेन यांना सावकारा सोबत नोंदणी करीत असताना ताबा घेताना कब्जे दार उभा राहिल्यास त्या मध्ये निराकरण होऊ शकते तसेच प्रकल्प थांबवता येत नाही परंतु शेतकऱ्यांच्या शंकांचे निराकरण होत राहील त्यासाठी शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे डॉ मोहन नळदकर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे . या शिष्टमंडळात मनोज भोईर, संदीप पाटील ,विजय पाटील, विनोद पाटील भरोडीकर ,कचरू कृष्णा पाटील ,वरूण पाटील यांसह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनFarmerशेतकरी