शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन ठाण्याला जोडण्यासाठी खाडीवर उभारला जाणार पूल; ठामपासमोर सल्लागार नेमणुकीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 06:23 IST

तीन हजार हेक्टरचा विकास

ठाणे : ठाणे शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून केला जाणार आहे. भविष्यात, या ठिकाणी बिझनेस हब आणि परवडणारी घरे अशा संकल्पनेतून नवीन ठाण्याचा विकास करण्याचा ठाणे महापालिका आणि एमएमआरडीए या दोन्ही प्राधिकरणांचा मानस आहे. त्यातही, घरापासून चालण्याच्या अंतरावर काम हीसुद्धा संकल्पना आहे. त्यानुसार, तब्बल तीन हजार हेक्टर जमिनीवर नवीन ठाणे विकसित केले जाणार आहे. त्यासाठी कासारवडवली ते खारबाव असा ४०० मीटर लांबीचा उड्डाणपूल खाडीवर उभारला जाणार आहे. त्याअनुषंगाने या कामासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे.

घोडबंदरपासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर हे नवीन ठाणे विकसित होणार आहे. मागील काही वर्षे नवीन ठाण्याच्या विकासासाठी पावले उचलण्यात आली होती. परंतु, त्याचा मुहूर्त सापडत नव्हता. आता खºया अर्थाने मागील वर्षापासून नवीन ठाण्याच्या विकासाला वेग आला आहे. त्यानुसार, खाडीपलीकडे असलेली खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचा विकास केला जाणार आहे. नवीन ठाण्याच्या विकासाच्या मार्गातील एकेक अडथळा टप्प्याटप्प्याने दूर होत आहे. त्यानुसार, गायमुख ते खारबाव हा खाडीपूल तयार करण्याच्या हालचालींना खºया अर्थाने वेग आला आहे. या पुलामुळे नवीन ठाणे अगदी ठाणे शहराजवळ येणार आहे. या पुलाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव फेब्रुवारी २०१९ च्या महासभेत मंजूर झाला होता. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात दळणवळण व्यवस्थेवर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे.

एमएमआरडीए अलिबाग ते वसई-विरार असा मल्टिमोडल कॉरिडॉर उभारला जात असून तो नव्या ठाण्यातील खारबाव या गावातून जातो. हा कॉरिडॉर घोडबंदर रोड ते मोघरपाडा येथील ४० मीटर डीपी रस्त्याने जोडण्याची तरतूद एमएमआरडीएच्या विकास आराखड्यात आहे. त्यामुळे नवीन ठाणे अगदी जवळ येणार आहे. विशेष म्हणजे या नवीन ठाण्याच्या दिशेने मल्टिमोडल कॉरिडॉर जात असल्याने आजूबाजूचे सर्व नॅशनल हायवे जवळ येणार आहेत. ही एक या शहरासाठी मुख्य आणि सर्वात महत्त्वाची जमेची बाजू ठरणार आहे.

या भागात तीन हजार हेक्टरवर नवीन ठाणे वसवले जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ७५ हजार परवडणारी घरे निर्माण करण्याचा पालिकेचा मानस असणार आहे. त्यानुसार, नव्या शहराची लोकसंख्या सुमारे चार लाखांच्या घरात जाणार आहे. आलिशान घरे बांधली तर कमी लोकसंख्या येथे सामावली जाणार असून इतर सोयीसुविधांवरसुद्धा ताण येण्याची भीती आहे. त्यामुळे परवडणारी घरे बांधणे, हाच महापालिकेचा मानस राहणार आहे. एमएमआरडीएने या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, १६ छोटीमोठी ग्रोथ सेंटर येथे निर्माण केली जाणार आहेत.

रोजगाराच्या संधीही होणार उपलब्ध

एमएमआरडीएच्या माध्यमातून नवीन ठाण्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. येथे येणाऱ्या कामगारांच्या निवाºयाची जबाबदारी पालिका उचलणार आहे. त्यादृष्टीने दळणवळण व्यवस्था ही महत्त्वाचा भाग मानली जात आहे. त्याअनुषंगाने कासारवडवली ते खारबाव असा खाडीपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या कामासाठी सल्लागार नेमण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. यासाठी ७२ लाख ६० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. खाडीवर पूल बांधण्याच्या कामाचे सर्वेक्षण करणे, प्रस्ताव तयार करणे आणि पर्यावरण व इतर विभागांची आवश्यक ती परवानगी घेण्याचे पालिकेकडून नेमल्या जाणाºया सल्लागाराच्या माध्यमातून केले जाणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र